तुझं ते निखळ हसणं तुझी ती मादक नजर
खुणावीत होती मला आणि माझ्या मनाला
येत होते आठवण मला तुझी हर एक क्षणाला...
*संजय**..
स्पर्श तुझा होता मला रोमांच उभा राहतो मनात
नजर मिळते नजरेला मन माझे भरून येते..
खेळच ग तो आपल्या दोघांचा...मनाचा...
*संजय**..
तुझं हात हातात घेताना
अजून कोणी तरी होतं तिथ
काय माहीत लोकांचं त्यात काय जात
चांदण्या पण लाजलेल्या तुझ्या माझ्या मिलनाला
लपून छपून त्या पण मनातल्या मनात हसलेल्या..
.*संजय**.
शब्द होते पण काव्य होत नव्हते
स्वर होते पण ताल जुळत नव्हते
तू आलीस बदलले माझे मन सुधा
खोटारडा असलो तरी तुझाच आहे...*संजय**..
तू भास नाहीस माझे सत्य आहेस
मनात असलेले तुझेच शब्द आहेत
तुझं प्रेम माझ्या शब्दातून दिसत आहे..
तुझ्याशिवाय माझे शब्द निघतच नाहीत...
*संजय**..
तू समोर असतेस
काव्य सुचते मला
तू नसलीस तर शब्द
पण रुसतात माझे..
*संजय**.
.कोजागिरीचा चंद्र सगळे
दुधात पाहतात...
मला नाही जमत ते..
तुला मी बस माझ्यात पाहतो....
*संजय**..
सूर तुझ्या पैंजणाचे
कानाला मदहोश करत होते...
स्वःतालाच काय पण
मला जगाला विसरायला लावत होते..*संजय**.
काल थांबलो मी तिथेच..
पण सुनामी तिथे आलेली ..
वाहणाऱ्या तुझ्या अश्रूत
मला वाहून गेलेली.....*संजय**..
तू लाऊन घेतली सवय ...
मला ते कधीच जमले नाही...
डोळ्यांचे पाणी कधी
बघ ना माझ्या हलले नाही...
शब्द परके झाले तुझे असे काही ..
ओठ माझे लवभरही हलले नाही ...*संजय**..
फुल पण आजकाल
प्रेम करायला शिकवतात..
मुर्झुन पण एका नव्या उमेदीनं...
उभं राहायला शिकवतात...*संजय**..
मनाच्या गहाराईत थोडेसे
झाकून थोडेसे पहायचेस..
मनाची चलबिचल माझ्या
दिसली असती तुला...*संजय**..
तू लोट्लेस दार मनाचे...
पण मन माझे तिथे नव्हते...
चोरून नेले कोणी तरी ते...
तुझ्याकडे तर ते नव्हते ?...*संजय**..
राख पण उरत नाही..
प्रेम कोणाचे जळल्यावर...
लोक आता दहावा पण होऊ देत नाहीत..
आज सरणावर चढलाय्वर..*संजय**..
तीर असा काही घुसला काळजात...
हु कि चू पण नाही करू शकलो...
थेंब असे गाळले रक्ताचे ...
कि बस नाव तुझेच लिहू शकलो ...*संजय**..
कसं रुसून चालेल पाऊसावर ...
माझ्या प्रेमाचं तो प्रतीक आहे...
तू जर नसलीस जवळ कधी...
सोबत तोच करतो माझी...*संजय**..
किंमत नाही केलेस माझी
मी तुझ्या जवळ असताना
आठवण येईल तुला पण ...
मी तुझा नसताना....*संजय**.
मनातून मागीतलीस तर
माफी पण मिळते...
माफीचे नाटक कधी
नाही येत कामाला....*संजय**..
उजाड रानात पण
सोबत तुझी हिरवळ देते ...
याच हिरवळीवर ....
प्रेम तुझे माझे फुलते...*संजय**..
श्वास तुझे अडले ...
माझे श्वास मी देईन...
अपेक्षा नसताना पण...
खूप काही करून जाईन...*संजय**.
.प्रेम हे मृगजळ पण असते...
प्रेम हे एक स्वप्न पण असते..
ज्याला मिळते तो जगतो...
बाकीचे नुसतेच जगतात...*संजय**..
कश्याला म्हणू मी सुख...
तू जवळ नसन्याला ?
कि अखंड या दुनियेत
माझ्या एकट्या असणायला ...*संजय**..
जीव जडला तिच्यावरी...
यात माझे काय चुकले..
दोघे अपुरे एकदुसर्यापरी..
प्रेमापुढे सगळेच झुकले ...*संजय**..
जन्म आणि श्वास सोबत असतात...
कवी आणि शब्द सोबत असतात...
बस जाणीव नसते त्यांना...
एकदुसार्याच्या अस्तित्वाची...*संजय**...
उन्हामध्ये उभी राहिलेस ..
पहा सावली तुझ्या सोबत आहे...
साथ अशीच असते प्रेमाची...
कळून पण न कळणारी...*संजय**..
एकदा उमटलेल्या पाऊलावर..
परत पाऊल टाकण्यात काही अर्थ नसतो...
हर्दयावर उमटलेल्या खुणा
अश्या नाही पुसता येत...*संजय**.
.सवय झाली तुला आता ...
वेळ देऊन वेळेवर न येनायची....
आता मी पण करत असतो copy
तुझ्यासारख्या बहाण्याची....*संजय**..
काही नाती अशी असतात...
तोडले तरी तुटत नाहीत...
प्राण कंठाशी आले तरी..
श्वास मात्र सुटत नाहीत..*संजय**...
दूर तुझ्यापासून जाताना ...
अश्रू माझे गळत होते..
तुला देलेले वचन कदाचित...
ते आजपण पाळत होते...*संजय**...
वाटी जळतात जसं माझ
मन जळत....
तेलही जळत, तूपही जळत
शेवटी काय उरतं...एक वाट तुझी ..* संजय**...
जीवन सुरु झाले तुझ्यापासून..
शेवट त्याचा पण तूच आहे...
परतीची वाट बंद केल्यावर....
जीवन नावाला फक्त शिल्लक आहे...*संजय**...
भ्रम असतो मनाचा
मनातच ठेवावा लागतो...
काही जन आता
तुझ्याशिवाय पण जगतील..*संजय**..
तुझं लटक रागावणं पण...
मनाला उभारी देऊन जातं...
माझ्यावरील प्रेमाची
परिणीती देऊन जातं...* संजय
भेटीच्या अगोदरच तू
विरहाचे दुख देऊन गेलीस....
पोहता येत नव्हते मला म्हणून...
दुखाच्या समुद्रात ढकलून गेलीस..*संजय**..
असतात अश्रू पण काही मगरीची...
त्याला आपण ओळखायला हवे...
शब्द शब्द नाही राहिले माझे...
विष बनून स्वःताच पीत आहे...*संजय**...
जितका जपलो नात्याला ....
ती माझ्यापासून दूर गेली...
किंमत माझीच उलट शुन्य झाली...
त्यांचं अरेरावी पुढे .....*संजय**..
नुसती सवय जुळून काय उपयोग ..
मन पण जुळायला हवेत....
तुझं माझ प्रेम बघून...
शेजारी पण जळायला हवेत...*संजय**..
जीवन हे सुंदर असते
त्याला शिक्षा का समजावी...
प्रेम करावे त्याच्यावर....
जशी मरणावर पण प्रीत असावी..*संजय**..
जरा लेखणी ठेव बाजूला..
थोडसं जगायला पण हवं...
त्या तिकडे पलीकडे एक
वेगळं जग आहे....
स्वप्नाळू ...तुझ्यासाठी..
सजलेलं ...पाहशील ....* संजय**..
मरण हे नसते प्रत्येक
गोष्टीला उत्तर ...
निसर्गही त्याचे ऋतू
म्हणूनच बदलत असतो..*संजय **
असे खेळ खेळायला
देवालाच जमत आहे...
नाही होत विस्मरण तुझे.
हे का देवाला कळत नाही..*संजय**..
तिला पाहिलेलं कधी स्वप्नात ..
आज मी तिला डोळ्यासमोर पाहिलं....
भर दिवसा एका चांदणीला
या धरतीवर मी पाहिलं...* संजय**..
पण कोणी का रडव तुझ्यासाठी ....
बस
जगावं आणि मरावं बस तुझ्यासाठी ..... ...
* संजय**..
मी तिला म्हणालो....मी नाही बोलणार आता तुझ्याशी...
ना ही कधी फोन करणार ....
गालातल्या गालात हसली...
अन म्हणाली ...बरं झाले सुंटीवाचून खोकला गेला ....
* संजू**....
टाळी नाही ग वाजत...
कधी एका हाताने....
दूर करून स्वताच ....
वेळेचा बहाणा करणं....
* संजू **.
नात्यात आपल्या सुनामी पण येईल ...
असं मला पण वाटल नव्हते ....
ती आली अन बघ न .....
सगळ्यांना घेऊन गेली...
अगदी निरपराधांना पण....* संजू**..
एक हात माझा....तुझा हात हातात घेण्यासाठी....
एक माझं मन.....तुझं मन समजून घेण्यासाठी......
माझे बाहूपाश ...तुला कवेत घेण्यासाठी....
सांग ना ग मग ...हा तुझं रुसवा कश्यासाठी....* संजय**...
असं फेकून दिलेस ....
जशी चहातील आहे माशी..
अशी ग तू कशी....
केलीस माझ्या प्रेमाची ऐशीतैशी..
*संजय**..
ज्यावेळी मी तुझा विचार करत होतो....
मी माझ्या डोळ्यातला एक थेंब सागरात टाकला...
आणि मी शपथ घेतली कि मी तुझा तोपर्यंत,
असेन जोपर्यंत तो थेंब मला सापडत नाही...*संजू**..
हात ठेव आपल्या हृदयावर...
माझी धडकन ऐकू ऐईल तुला...
मग सांग ना ग राणी तरी ....
का आहे असा हा अबोला ....
सखे सोड ना अबोला ...* संजू**......
एक स्वप्न तुझं मी पाहिलेलं.....
एक आशा डोळ्यात मी पाहिलेलं.....
एक हात तुझा माझ्या हातात...
सांग ना ग कधी मिळेल हे सगळं...* संजय**....
मन दाटले होते ........पण शब्द फुटत नव्हते ....
नभ पण भरले होते काळ्या ढगांनी.......
पण पाणी असे बरसत नव्हते....
सांग ना ग का ? प्रेम नव्हते का तुझे माझ्यावर.....सांग ना....
* संजय**..
पावसात तुझ माझ्यासोबत असणं ..
हेच माझ्यासाठी खूप काही होतं...
त्यात तुझं चुंबन देणं म्हणजे तर....
नक्षत्राच एक सुरेख लेणं होतं..* संजय**....
सुरुवात का होत नाही दिवसाची तुला बोलल्याशिवाय .सांग न
फुल का फुलत नाही तुझ्या वेणीत लागल्याशिवाय .सांग न
सुगंध का दरवळत नाही तुझी चाहूल लाग्ल्याशिवाय ...सांग ना
सांगशील मला * संजय **..
येतात शब्द ओठावरती पण हात माझे हलत नाहीत...
एका तुझ्या आठवणीत अश्रू पण ढळत नाहीत......
कशी लिहिणार मी कविता पान माझे ओले झाले....
एक तुझ्या आठवणीत मन चिंब चिंब झाले *संजय**...
एक तिच्या अस्तित्वाची छत्री
आज माझ्या हाती होती......
आठवणींचा पाऊस झेलत मला,
पुढे घेऊन चालत होती......* संजय**...
किती सुंदर असत ना..कोणी तरी आपल्यावर प्रेम करणं ...
किती सुंदर असतं ना ...कोणाच्या तरी स्वप्नात हरवून जाण...
किती सुंदर असतं ना ...कोणी तरी आपल्या दुखावर फुंकर मारण..
खरेच किती सुंदर असतं ना ..* संजय **...
कधी तरी येतेस ...कधी तरी जातेस..
मन बैचेन असते अगदी...मनाला हुरहूर का लावून जातेस......
का ग अशी का करतेस सांगशील का ?..
...* संजय **....
रक्ताचा तो सडा निसर्गाने पण पहिला....
त्याच्या डोळ्यातून पण मग अश्रूंचा पूर वाहिला........
दुख करता करता त्याचे बोलायचे राहून गेले....
आणि सरकार म्हणते सगळे पुरावे वाहून गेले......
.....* संजय **.....
नाती हे असेच असतात ..बस असून नसल्यासारखी ........
खूप जवळ वाटतात पण असतात खूप खूप पारखी....
पण एकाच नातं असं असत...अगदी निर्भेळ .....सुंदर
तुझं नि माझं ...आपल्या मैत्रीचं ....खरे न ग .........* संजय**.....
एक स्वप्न डोळ्यातच बसवले मी...
मनातच मनाला हसवले मी .....
वेदना या मनाला ही उमटली किती....
डोळे तुझे सुजलेले बघितले मी...* संजय
कधी कधी ना मला
चाकोरीबाहेर पण जायला आवडतं..
नाहीस माझी तू पण तुझं
बनायला पण आवडतं .....*संजय**..