Wednesday, October 5, 2011

मंजुषा ताई च्या चारोळ्या.

आत्मिक नात्यांचे मोल ..
सामान्यांना काय कळणार ..
दूर झाले असले तरी ..
अखेर एकमेकांनाच मिळणार ...
मंजुषा

एकनिष्ठ आहे तुझी सखी ..
कधीच नाही चळणार...
वचने तुला दिलेली ..
नेहमीच पाळणार..
मंजुषा

रोखून माझ्याकडे असे ...
काय रे बघतोस ...
कि नजरेनेच नुसते ..
पिवून टाकतोस ...
मंजुषा

तुला काय वाटल ..
तुझ्या जाण्याने जग माझ संपल .
तुझ्याशिवायही राहाण .
मी केव्हाच शिकलं..
मंजुषा

खूप मोठी चूक केलीस ..
मला सोडून जाण्याची ..
वाटच बंद करून टाकलीय ..
मी तुझ्या परतीची ..
मंजुषा

तूच तर होतास ..
माझ्या कवितेची प्रेरणा ..
तुझ्या पश्चात शोधावा लागतो ..
नित्य नवा बहाणा ..
मंजुषा

आहेस का रे तुही सुखी ..
माझ्यापासून दूर जावून ..
माणसांच्या या अफाट गर्दीत ..
मला एकटीला लोटून ..
मंजुषा

कवीनेच त्यागले ..
तर कवितेने काय करायचे ..
श्वासांना (शब्दांना ) तिच्या ..
कोठे शोधायचे ????????
मंजुषा

0 comments:

Post a Comment