Showing posts with label लक्ष्मीकांत. Show all posts
Showing posts with label लक्ष्मीकांत. Show all posts

Tuesday, October 11, 2011

मजेदार चारोळ्या: चारोळीला चारोळीने उत्तर - भाग २

असतात काही झुडपे
चार महिन्याच्या पावसात जगणारी
असतात काही माणसे माझ्यासारखी
आयुष्यभर नुसत्या आठवणीत जगणारी
रेशु ०९/१०/२०११ रात्री १०.३०

    
नुसत्या आठवणीत जगून
काही मिळत नाही
जीवनात ठेवले आहे काय
एका प्रेमाशिवाय....

तुझ्यासाठी आठवणी तरी आहे
माझ आयुषच जणू एक मृगजळ आहे
भास आहे केवळ तेथे कोणीतरी असण्याचा
कंटाळा आलाय आता सारखा भासात फसण्याचा
लक्ष्मीकांत

सोडा मृगजळाच्या मागे धावणे
स्वतःतला कस्तुरीमृग शोधा
जीवन हे क्षणभंगुर नुसते
भंगाशिवाय मिळणार काय दुसरे..
*प्रेम*

मला मृगजळाच्या मागे नाही
सोबत धावायचं आहे
भंगलेलं ते स्वप्नं
परत एकदा जोडायचं आहे
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.०४

जोडणारे स्वप्न पाहत
आयुष्य निघून जातं
मृगजळ शेवटी मृगजळच राहत
नसते कोणाचे ...कोणाशिवाय ..
*प्रेम*

मान्य आहे मला
मृगजळ मागे धावणं योग्य नाही
पण डोळ्यात माझ्या सामावलेलं
स्वप्नही एवढा छोटं नाही .......
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.१५

डोळ्यांची स्वप्न आजकाल
चष्म्यासारखी बदलतात
आज एकासोबत तर
उद्या दुसर्यासोबत फिरतात..
*प्रेम*

स्वप्न असुदे डोळ्यात तुझ्या
पूर्ण करण्याचा हट्ट नको
प्रयत्न असू दे तसा
पण स्वप्नात जगण्याची सवय नको
लक्ष्मीकांत

हसू नका असे ,सत्य आहे
सत्याचा सामना करा
खरे प्रेम शोधा स्वतात
मग पारखून प्रेमाचा स्वीकार करा ..
*प्रेम*

सत्य हे कटू असते...
त्याला हसुन करू गोड...
सत्यातली सत्यता घे जाणून...
कधी कधी त्यालाही असत्याची जोड..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.२७

प्रेम आणि असत्य
कधीच सोबत असू शकत नाही
मग शेवट काय होणार त्याचा
अगदी ठरलेला...
*प्रेम*

हा हा हल्ली असत्यालाच
१००% सत्य दर्शवतात
प्रेमाचे काय घेवून बसलात
गल्ली बोळात प्रेमाचे खोटे चाळे चालतात
रणजीत..११.३६रात्री ०९/१०/११/

वेड्या असत्य आणि प्रेम यांच
अतूट अस नात
असत्याचा हात धरला तरच
आजच प्रेम टिकत
लक्ष्मीकांत

प्रेम आणि चाळे म्हणजे
मन आणि वासना
कोणी काय करायचे
ज्याचे त्याने ठरवावे....
*प्रेम*

सगळे असाच विचार का करता तुम्ही ???
कुणाचाच का प्रेमावर विश्वास नाही राहिला
खरा प्रेम करून तर बघा आधी
तुमच्या सत्य असत्यात प्रेमाचा पण जीव घुसमटला
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.४०

प्रेम म्हणजे आजकाल
फळाप्रमाणे झाले आहे...
ऋतूप्रमाणे ते पण
नेहमी बदलत जाते ..
*प्रेम*

आजची परिस्थितीच अशी
खरे खोटे काय समजत नाही
जिकडे तिकडे अनैतिक चाळे सगळे
खरे प्रेम मिळणार तरी कोठे....
रणजीत..११.४३रात्री ०९/१०/११

आजकाल तर असत्य असलेलेच
प्रेम टिकू शकते
कारण खऱ्या प्रेमाची
कोणालाही जाण नसते !!!!
*आशीष*

प्रेम...? आईने केलेले ते..?
की बाबांच्या धाकामागे लपलेले...
प्रेयशी ने केलेले प्रियकरावर...
पण ते ही समाजाच्या जाळ्यात गुरफटलेले..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.४७

प्रेम, प्रेम आज उरलाय कुठे??
प्रेमाचा आणि त्यागाचा संबंध आता राहायलाय कुठे?
उठतोय सुटतोय तो प्रेम करतोय
घरचे नाही म्हटले तर प्रेमाला सोडून देतोय..
लक्ष्मीकांत

असेल खरे प्रेम तर
समाजाशीपण लढता येते.
पण समाजाच्या नावाखाली
प्रेमाचा बाजार सगळा.
वापरले अने फेकून दिले..
*प्रेम*

प्रेम म्हणजे प्रेम असत
सत्य असत्या असं त्यात काहीच नसतं
त्या अनैतिक चाल्यांमध्ये सुद्धा
त्या दोघांच एकमेकांवर प्रेम असत
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.५०

नुसता बाजारूपणा
प्रेमाच्या नावाखाली
स्वतःतर बरबाद
पण दुसर्याला हि कलंकित करे
रणजीत..११.५३रात्री ०९/१०/११/

प्रेम म्हणून चाळ्यांना
प्रेमाचे नाव नको देऊस
असत्यावर आधारलेले
प्रेम ते कसले...
*प्रेम*

खरे प्रेम तेच जे...
मनात वसलेले असते...
नियमांना तोडून जे...
निरंतर टीकून राहते..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.५६

आजकाल प्रेमाची संकल्पनाच बदललीये
भावनांची जागा आज चाळ्यांनी घेतलीये
विश्वास होता एके काळी
आता लाजेचीही झालीये होळी.
लक्ष्मीकांत

तुझं माझं प्रेम...
आपल्या मैत्रीतच वसलेलं...
तु हाक मारलीस अन...
मी अचुक ऎकलेलं
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.५९

हाक नव्हती ती तुझ्यासाठी..
तो एक तुझा भास होता...
हवेतून आला कानापार्येंत
आणि विरून गेला....PP
*प्रेम*

तुला भारीच सवय...
मना मध्ये बोलायची..
मी समोर असलो..
माझी पण व्हायची गोची..
©*मंथन*™.. १०/१०/२०११ रात्रौ १२.०५

जाते आहेस तर जा
पुन्हा या प्रेमाच्या बाजारात नको येउस
अशाने आयुष नाही घडायचे
यात च मी माझे अमुल्य क्षण गमावले
*** आशिष ***
मनाची भाषा कळायला पण
मन असावं लागतं
मोकळ्या मनानं बोललीस
तर कळले असते मला..PP
*प्रेम*

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.०५

अर्थ मनात असतो
नाही शोधलास कधी तू
नाही बोललीस तरी
डोळ्यांची भाषा कळते मला...PP
*प्रेम*

न बोलण्याने गुंता कधी सुटत नाही
भावना व्यक्त होण्याच्या थांबत नाही
शब्दांची साथ नसेल कदाचित
संवेदना खुलल्याविना राहत नाही
लक्ष्मीकांत

तुझ्या येण्याची चाहूल...
देऊन जातो हा वारा वाहणारा...
अन तुला भेटायचे म्हणून...
तो उडालेला माझा गोंधळ सारा...
©*मंथन*™.. १०/१०/२०११ रात्रौ १२.१३

गोंधळ तुझा उडाला
तिला ते सवयीचे होते
फुलपाखरुच होते ते
उडाले या डालीवरून
दुसर्या डालीवर....PP
*प्रेम*

 तुझ्या सोबतच्या पाऊलखुणा
शोधतच राहीन मी
अजूनही आस आहे तुझ्या पावलांच्या परतीच्या वाटेवर
माझ्या किनार्यावर परतणाऱ्या प्रत्येक लाटेवर
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.२०

लाटा येतात लाटा जातात
लहान आणि मोठ्या पण
प्रत्येक वेळी नवनवीन
रुतलेल्या खुणा तुझ्या
वाहून गेल्या लाटेसंगे ..PP
*प्रेम*

येईन पुन्हा मी तुझ्या किनार्यावर
पण हवी आहेस मला तू, पुन्हा त्याच वळणावर
भेटलो होतो त्यावेळी आपण तसे
हातात हात नसूनही एकरूप होतो जसे.
लक्ष्मीकांत

मी वाहवत गेलो खूप दूर
तुझ्यामुळे
तू राहिलास किनार्यावर
तर मी दुसर्या किनार्यावर...
न भेटणाऱ्या ....
*प्रेम*

किनार्याच्या लाटा काय रे
येतात आणि जातात तरी
माझ्या मनातून तू जात नाहीस
शब्दातून तू जरी गेलास तरी
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.३०

मन असते काय ग
कोणावरही जडतं
शब्द सुटतात तीरासारखे
घुसतात काळजात अगदी
खोलवर....कधीही न संपणारे ..
*प्रेम*

जेव्हा मी वही पेन घेऊन बसते
तेव्हा मला शब्दच नाही सुचतात
पण रोज रात्री तुमच्या सोबत या मैफिलीत
चारोळ्यांचा थरवर थर रचतात
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.४१

वही आणि पेनाचेपण बघ ना
असेच असते एक भरत जाते
तर दुसरे संपत जाते....
बस थर निर्माण होतात आठवणींची तुझ्या......
*प्रेम*

शब्दांच्या साठी साठी वही पेनची गरज काय
शब्दांचे आकाश आहे खुले
शब्दांचे सारे तारे येथे
भावनांच्या साथीने होतील त्यांची फुले
लक्ष्मीकांत

खुल्या आकाशातच प्रेम
तुझे खुललेले
आज कळी उद्या फुल झालेले
अन तुटून मुर्झुन गेलेले...प्रेमाशिवाय....
*प्रेम*

सवयच विकृताना जे चांगले चालले ते
उध्वस्त करण्यासाठीच आयुष घालवले त्यांनी
दुसर्यावर टीका करण्यात चांगले काय जमले नाही
म्हणून असे उदोग चालवले
*रणजीत*

या सगळ्या भाऊगर्दीत
माझं प्रेम हरवून गेलं
सांगायचं होतं तिला काही तरी
सांगायचं राहून गेलं ..
*प्रेम*

Sunday, October 9, 2011

मजेदार चारोळ्या: चारोळीला चारोळीने उत्तर..

तू जाऊच शकत नाही
माझ्यापासून दूर
शब्न्दात माझ्या असा गुरफात्लास कि
आता तुला ते सोपं नाही ..सोपं नाही ..सोपं नाही ..
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.१५

जावे तर सगळ्यांनाच लागे
हा तर खेळ नियतीचा
क्षणिकच तू अन मी
यात गुरफटणार तरी मी कसा
रणजीत...रात्री ०३.०६)०९/१०/११

नात तुझं माझं,
एका क्षणभराचा !
अन त्याच क्षणात
लाख जन्म जगणाऱ्या अमृती जीवनाचं !!
रेशु ०९/१०/२०११ रात्री 3.३२

नात तर सांगते
अन दुसर्याच क्षणाला
मला हरवण्याचा गोष्टी तुझ्या
अमृत ते हि विषासमान वाटे ....
रणजीत...रात्री ०३.३६)०९/१०/११

तुला विष वाटो व अमृत
मला जिंकण्याचं वेध लागलाय आता
जसा मेलेल्या
आत्म्याला जगण्याचा आकर्षणाचा !!
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.४८

हडळीसारखे वागणे तुझे
जिंकण्यासाठी आंधळीच झालीस तू
हे ना कळे तुला जिंकली जरी तू
हरण्याचे दुख: ना आजतागायत मला
तुझ्या चेहऱ्यावरच्या हास्यात आनद तो मजला....
रणजीत...रात्री ३.५६)०९/१०/११

या मांडलेल्या खेळाच्या बाजारात
तू बोलतोस तुझी जीत आहे
खर तर तू तुझ्या मनाला विचार
जिंकून काहीतरी नक्की हरलायस तू
रेशु ०९/१०/२०११ रात्री ४.०५

आज थांबलो आहे जिंकून हरण्यासाठी
पुन्हा नाही थांबणार शब्दांचा खेळमांडण्यासाठी
अस्तित्वासाठीच जगडतो आहे आजही
म्हणून तर मृगजळसारखे जगणे मला नाही जमणार.....
रणजीत...पहाटे ०४.२१)०९/१०/११

तुझ्यात स्वत:ला,
बघत होते मी.
तुझ्यात मन माझे,
शोधत होते मी.
आता तुझ्या जिंकण्यात
स्वताला हि हरवले मी
रेषु ०९/१०/२०११ रात्री ४.२५

असे माझ्यात तुझे
बघणे ते कसे म्हण्याचे
अंता पर्यंत वाट पाहायाची
अन शेवटी तूच हरलास
असे दाखवून जयायचे....
रणजीत...पहाटे ०४.३०)०९/१०/११

दिलेली भेट प्रेमाची असते, तागडीत तिला तोलू नये
खोक्यावारल्या खोडलेल्या किमतीचा अंदाज कधी करू नये
जेव्हा जगन हा एक भार असतो तेव्हा शब्दांचाच आधार असतो
म्हणून तू आणि मी जिंकलो आहोत का हरलो ते कृपया सिद्ध करू नये
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.३७

थांब थोड बोलायचे आहे
असे म्हणून कोणी आईकून
घेत नसे कोणाचे
जीवनात हार जीत महत्वाचे नाही रे
हसत जगत असताना चार शब्द प्रेमाने बोला रे
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ४.४०)

मुलगा चार शब्दांच आयुष कधीच नसत
सा-या शब्दात आयुष्य घुत्मल्त
हवी असते एखादी गोष्ट जेव्हा
आयुष्यच आपल्याशी दगा करत
लक्ष्मीकांत

अरे मना.. तू अजुन बेचेंन का?..
प्रेमाच्या जखमा अजुन भरल्या नाहीत..
तरी त्याची ओढ का????
काटेरी एकाकी रस्त्यावरून चालताना...
फुलांच्या पायघद्यांची स्वप्न का??????
आयुष्याची मिळालेली वाट एकटीने,
चालायची अस समजून सुद्धा...
कोणाचा सोबतीची आस का????? -
आयुष्यात हरलेय पूर्णपणे,
तरी जिंकायची आस का ???????????
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.४९

मी नाही हरलो
नाही माझे प्रयत्न हरणार
माझ्या बरोबर
तुम्हाला हि जिंकावेच लागणार
रणजीत.....१५/०८/११/ (रात्री १२.१०)

हरू नकोस इतक्यात
जगण आयुष्या पेक्षा मोठ आहे
थांबू नकोस आता
खड्ड्यांची हि सुरुवात आहे
लक्ष्मीकांत

भूतकाळात कासवाला कमी लेखले
आळसाने सस्याला हरवले..
पण,आज कासव जिंकले नाही
कारण,ससा वाटेत ’झोपला’ नाही..
अरे,ससा आता कधीच हरणार नाही
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.५५

भूतकाळातील चुका तू सुधरशील
हे खरे जरी एकदा तू हरले
पुन्हा हट्ट करू नको जिंकण्याचा
काय सांगावे कासवामुळेच हे धाडस तुला आले...
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.००)

हुश्शश्श्श्स, झाले शांत सगळे
गेले सारे रातकिडे
जगणे संपल्यावर कळले
मृगजळा मागे धावणे व्यर्थ आहे
लक्ष्मीकांत

ना जिंकण्यासाठी ना हरण्यासाठी
शब्द देऊनच शब्द घेतो आहे
शब्दच्या देवाण घेवानेच तरलो आहे
घड्याळाकडे लक्ष ना कोणाचे
तू मी शब्दांचा खेळ खेळतो आहे
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.०६)

धाडस मला भूतकाळातील चुकानेच आले
पण जिंकण्यासाठी cheating नाही केली खेळात
आजही परत मी जिंकता जिंकता हरले
कशी नशीबाने परत थट्टा माझी मांडली या काळात
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.१४

तुझ्या धाडसाला सलाम माझा
पण अनाधिकृतपणे खेळ ना खेळलो मी कधी
तू तर हरवण्यासाठी खेळतेस आणि मी जिंकवन्यासाठीच
म्हणून तर तुझी थट्टा तूच करतेस.......
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.२२)

हातात हात देती, तू चालशी पुढे अन्
अर्ध्यावरुन मागे वळतात लोक येथे
सोडून एक‌‍ट्याला पळतात लोक येथे
दुसर्यांना हरवण्यासाठी डाव मांडतात लोक येथे
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.३३

हात आपण सोडतो, नावे लोकांना ठेवतो
डाव हरण्या जिंकण्यासाठी कधीच नसतो
तुलना करून आपणच त्यामागच समाधान जाळतो
लक्ष्मीकांत

हात देऊन मागे खेचणे ना जमले मला
आता पर्यंत मदतीचा हात देतो आहे लोकांना
तेच लोक हरण्या जिंकण्याची भाषा करतात
चार चोघात मलाच परके करून
स्वतःच माझ्या पाठीत खंजर खुपसतात..
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.३६)

आपल्यासाठी परके कोणीच नसते
आपणच आपल्यासाठी परके बनतो
चार चौघांच्या प्रतिष्ठे पायी
आपणच आपलेपण गमावतो.
लक्ष्मीकांत

आता सगळं संपलय,
उठलाय खेळाचा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
आता माळ आसवांची
पाहतेय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार
नाही कुणाच्या - साथीची
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.५०

वाट पहाणे हेच तर जीवन आहे
साथ घेण्यापेक्षा देण्याला महत्व आहे
झाल असत जर सगळ वेळे आधी
म्हटल असत मग आता जगण्यात काय मजा आहे .
लक्ष्मीकांत

आता खर असं वाटतेय कि
मी जिंकुनही हरले तू हरुनही जिंकला
मला खुप गर्व होता माझ्या शब्दांवर
आता तेच शब्द फ़क्त हसुन पाहत आहेत माझ्यावर
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.००

खूप खेळ खेळलो चारोळ्यांचा
वाटे कधी ना थांबो हा खेळ चारोळ्यांचा
पण तू अशी साथ ना कधी देणार
ना मला हौस जिंकण्याची
मला तर हौस दुसर्यांना सुखी पाहण्याची
म्हणूनच तुला जिंकवण्या करीता
केलेल्या चारोळ्या पुन्हा खोडतो मी....
तुझ्याच चारोळ्या जास्त तुलाच दर्शवतो मी....
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.५६)

शब्द आहेत ते
कधी न रुसणार कुणावर
मायेने गोंजारा त्यांना
नेतील ते एका सुंदर वळणावर
लक्ष्मीकांत

शब्दही उरले नाहीत आज सांत्वनाला !
अर्थ कधीच नव्हता त्या माझ्या शब्दांना !
एकदाच ये एकदाच माझ्यासाठी ,
यायचे न मी तुला पुन्हा कधी विनवायला !!!!!! !
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.१२

इतक्यात तू कशी हरली
बाजार तो कसला
मानतेस हा तर खेळ शब्दांचा
दुख: सोबत एकटेपणा आले तुझ्या वाट्याला
आम्ही असता तुझ्या सोबतीला
हसतात हसतच आले असतील ती आसवे
उगाच त्यांना दुखाचे नाव नको देऊ
आस ती डोळ्यात असवी नव्याची
पण साथ तुझी मी अजून सोडली नाही
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ६.१४)

हे ते पहा सूर्य उगवतो आहे
कदाचित त्याला हि घाई झाली असावी
शब्दांचा खेळ हा पाहणायची
आम्ही थकलो नसून
जागेच आहोत तुझ्यासाठी
हे सांगायचे आहे मला हि
०९/१०/११. (पहाटे ६.२६)

अखेर तू मला सोडून गेलास ,
भन्नाट वादळी वा-याप्रमाणे.
मी तुझ्या प्रेमात वेडी झाले ,
पण ते प्रेम तु पायदळी तुडवून गेलास ,
दिलास नकार मजला आणी,
परका करून गेलास .
जिंकून सवॅकाही
इथेच मला कायमचा हरवून गेलास
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.३०

हि घाई तर तुलाच
मला सोडून जाण्याची
वादळा समोर नतमस्तक होण्याची
आले प्रसंगात साथ न देताच
मला खोटे ठरवण्याची
जिंकणार तरी तू कशी
तुही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी....
०९/१०/११. (पहाटे ६.३६)


तू जिंकण्यासाठी स्वतःला हरवत गेले मी ..
स्वतःचे अश्रू विसरून तुला हसवत गेले मी ...
वाटलं होता थांबवशील मजला ..
नकळत स्वतःला एकट टाकून गेले मी ..
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ०६.४३


मी ना आस धरली जिंकण्याची
पण एक बरे तू हसण्यास लागली
आता हरून देखील जिंकलीस
मग तू एकटी कशी म्ह्नायायची.......
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ६.४६)