Showing posts with label चारोळ्या. Show all posts
Showing posts with label चारोळ्या. Show all posts

Saturday, March 3, 2012

फेसबुक खोड्या

कुछ हटके ...
मित्रांनो मजेत घ्या बर ..नाहीतर म्हणाल म्हतारीलाच लागलाय चळ..

जुनीच पोस्ट आहे पण पुन्हा ताजी करू यात ..तरुण मित्रांसाठी ...एन्जॉय ...

फेसबुक खोड्या
.
1)ऑनलाईन च्याटवर जोपर्यंत ..
चेहरा तुझा दिसतो ..
ल्यापटोपचा स्क्रीन माझा .
तोपर्यंत चालूच असतो .
मंजुषा .

2)डोळ्याच्या कोनातून ..
हळूच तुला बघते ..
तुही बघत असशील म्हणून ..
पटकन डोळे मिटते ..
मंजुषा

3)तुझ्या वालवरचे स्टेटस ..
वाचून मी घेते ..
त्यावर कॉमेंट म्हणून ..
मी माझे स्टेटस टाकते ..
मंजुषा

4)वालवर तुझ्या सारखी ..
चकरा मारते ..
तुलाच भेटल्याचे समाधान ..
मानून घेते ..
मंजुषा

5)गुप्तहेरासारखी बारीक नजर ..
साऱ्यांवर ठेवते ..
चुकतंय कोणी दिसलं ..
तर कान पीरगळते ..
मंजुषा

6)कधी चारोळ्या ,कधी कविता ..
कधी प्रबोधन ,कधी आत्मचिंतन ..
फेसबुकच्या या विश्वात ..
मुक्तपणे करते भ्रमण ..
मंजुषा
१० /११ /११

Tuesday, January 3, 2012

रणजीत च्या चारोळ्या-मेहफ़िल

का कोणास ठाऊक
पुन्हा पुन्हा यावेसे
वाटते तुझे मदमोहक
नृत्य पाहण्या मन माझे
तुझ कडे वळते...
रणजीत

मी हि झुंबर होतो
अशाच रंग महाली
जिथे उधळत असते
अखंड योवन लाली
रणजीत

तू केसात माळतेस गजरा
नृत्या बरोबर गातेस हि
करुनी हसतमुख चेहरा
म्हणूनच का लोक म्हणती याला मुजरा
रणजीत

तू सुंदर लावण्यवती मेनका
करशी अनोखी अदा
मग मीही रंगेल होऊन
उधळतो दोलतजादा
होऊन फकीर तिथला
रणजीत

कित्येक मर्द येती
तुझ्या दारा
आयकुनी नृत्य,गाणी
ठेऊन जातो भाव वेगळा
रणजीत

तू नृत्य करता करता
गायशी गाणी
मदहोश करते त्याहुनी
तुझी नजर बोली
रणजीत

संपत चालला योवन रंग
सुरकुतलेले केतकी अंग
म्हणून कोरड्या दुष्कागत गर्दी
कधी तरी होते आता सुरांची दर्दी
रणजीत

उदास तू बसली
मोकळ्या महाली
काळ तो आठवता
स्वतः हसली स्वतः वरती
रणजीत

मी याच आशेने इथे बसलेला
सजेल बैठक गर्जतील वादये
जुळेल ते नाते हाताचे गजर्याशी
तू पुन्हा तीर्क्शील या रंग महाली
रणजीत

मला वाटले नव्हते
माझी आस हि
मृगजळ होऊन बसेल
तुझी साथ आता मला
कधीच नसेल
रणजीत

तुला पाहताच नाव
माझे हरवले होते
तुझ्याच ओठा वरती
मग आले होते
रणजीत

तुज्याच पायाखाली
पैंजण बनून
हरवलो होतो
नृत्य संपताच
स्वतःला सापडलो
रणजीत

सांग ना पुन्हा कधी
मला साद देशील
तुज्या हाकेसाठी
माझे कान हि तरसतील
रणजीत

का हि वेळ आली
अन तू मला
रंग महालातून
जाण्यासाठी शुभ रात्री म्हंटली...
रणजीत

अशी काय जादू
तुझ्या मैफिली
मी न राहतो
माझ्या मनी...
रणजीत

अग थोड बोलाचे
तरी होतेस मी
तर महाल बांधला
होता तुझा नावचा
त्यात तू होती नर्तिका...
रणजीत

तुझ्या त्या आदाने
मी तर झालो होतो फिदा
न राहून लोक हि बोलले
झाला हा हि वेडा..
रणजीत

तुझ्या मैफिलीत
येती लोक खूप
मी हि कोपरा
पकडून बसतो चूप
रणजीत

आजही मी रंग महाली
जाऊन येतो जरी
तू नसली तरी तुझ्या
आठवणी ताज्या करतो
रणजीत

तू तर नटरंग
नारी भलतीच
भुरळ पाडी तुझी
नृत्य,गाणी...
रणजीत

Monday, November 14, 2011

बालदिनानिमित्ता चारोळ्यांचा अनोखा नजराणा


आम्ही असू बालके
कधीही नसलो जरी नीटनेटके
खिशात हवी चोकलेट्स
नाहीतर रहावत नाही एकटे

फ़ुगा नाही मिळाला तर
गालाचा आमच्या फ़ुगा होतो
आई बाबां आणि नातेवाईंकासमोर
आमचा मुद्दाम पचका केला जातो

नाकातून गळणारे टिपूस बघून
समोरचे खोखो हसतात
कधी रुमाल देतात तर
स्वत: च येऊन पुसतात

लहान असताना बाप्पापेक्षा
प्रसाद हवाहवासा वाटतो
कोणताही पोषाख घालून मग
शाळेत फ़ेन्सीड्रेस होतो

दप्तर सांभाळताना
एकाहाताने वोटरबेग सावरतो
अर्ध्यावर आलेली विजार
चाचपडत नीट करतो

शाळेत खेळून कपड्यांची
चांगलीच वाट लागते
आई मग कपडे धुण्यावरून
चार सल्ले देत राहते

जेवण्यासाठी शाळेत
एकट्याने डबा जात नाही
एकमेकांच्या डब्यातले पाहिल्याशिवाय
आपल्या डब्या मजा येत नाही

लहान असताना मिळणारी गिफ़्टस
आता कधीच मिळत नाहीत
लहानपणी कुरवाळणारे
हल्ली मात्र लाड करत नाहीत

अजूनही आठवते ते अल्लड
आणि खट्याळ बालपण
बालवाडीत साजरा केलेला
प्रत्येक मराठी सण

पुन्हा लहान व्हाववेसे वाटते
पाटिवर श्री गणेशाय नम: लिहायचंय
पण पाटी हरवली मुलांची
मग वहिवरंच काम भागवायचंय

पाटिपूजन कालबाह्य झालं
कोण विचारील पाटीला
लेपटोपवरंच सगळे ज्ञान मिळते
कोण जाईल मग शाळेला

बालदिन कसा साजरा व्हायचा
याची कोणालाच जाण नाही
आता मोठा झालास तू म्हणत
आमच्या मनाची कदर नाही

पुन्हा चेहर्‍यावर मुखवटे चढावून
वाढदिवस साजरा करायचाय
पण बाबा केक आणंत नाहीत
मग गोड शिर्‍यावरंच समाधान मानयचंय

लिहायला बरं शिल्लक आहे पण
आजपासून कोलेज चालू शाळा नाही
आम्ही लहान आहोत अजून गप्पा मारा
बाल्यावस्था अजून संपली नाही __

प्रथमेश शिरसाट

Monday, November 7, 2011

मंथन च्या चारोळ्या.. भाग २







Add caption



Add caption

Sunday, November 6, 2011

प्रदीप काकांच्या चारोळ्या भाग २

सुंदर स्त्री दिसली की नकळत वळतात नजरा...
रेखीव पुष्ट देहयष्टी पाहुनी तुप्त होते आपुले मन...
एक क्षण वाटत वाईट असं सौंदर्य नाही आपलं...
क्षणात होता नजरा नजर लाजेने चूर होते मन...
-- प्रदीप केळकर...

सौंदर्याची किंमत ना नाही मोजावी लागत सुंदर स्त्रियांना...
जपावी तिने नित्य साधी रहाणी अन उच्च विचारसरणी...
लाघवी व्यक्तिमत्व मिठास वाणी शुद्ध आचरण ठेवी निर्मल...
सुंदर स्त्रीकडे पाहता दिसावी आपुलीच माय तिच्या ठिकाणी...
-- प्रदीप केळकर...

वागण माझं खुपतंय तुला हे कळतंय मला...
तुझ्या धारदार शब्दांनी घायाळ केलंस मन...
आला राग विचार नाही केलास तुझ्या चुकीचा...
धरला मी अबोला झालो स्तब्ध शांत झालं मन...
-- प्रदीप केळकर...

मनातील काही भावना नाही सांगता येत शब्दात...
नाही शब्द फुलत ओठी नाही येत प्रितीच्या भावना...
नयन बोलती चेहराही खुलतो ओठ हसती आनंदानी...
कळत नकळत झालेला तुझा स्पर्श सांगे प्रीती भावना...
-- प्रदीप केळकर....

स्वत:साठी सगळेच असतात जगत...
एक दिनी जगून पहा फक्त दुस-यासाठी...
येईल समजून दु:ख त्यातून शोधा सुख...
जाणा सुख दु:खांचा खेळ आपल्यासाठी...
-- प्रदीप केळकर...

कठोर शब्द तुझे मनाला घायाळ करुनी गेले...
झालेली चूक आली लक्षात वाटलं खूप वाईट...
चूक येईलही सुधारता मनाला जखमेचे काय...
जखमेचा व्रण मनाला चिकटून रहाणार घट्ट...
-- प्रदीप केळकर...

तुझ्यावर केलं मी मनापासून प्रेम...
जिभेवरील शब्द ओठीच का थबकले...
नाही व्यक्त करू शकलो मी प्रेमभावना...
तू संधी देऊनही माझे प्रेम अबोल जाहले...
-- प्रदीप केळकर...

राहणे शक्य नाही ईश्वरास आपुल्या भक्तांचे घरी...
शोधिला उपाय ईश्वराने रुपात आईच्या राहिला...
आई आपणासी परम पूज्य लीन व्हावे चरणी...
भाग्य थोर म्हणुनी सहवास आईचा लाभला...
-- प्रदीप केळकर...

क्षण ते प्रितीचे लागतात विसरावे...
एकतर्फी प्रीतिला नसतो अर्थ काही...
येईल आठवण जेव्हा ठेवावे शांत मन...
प्रितीशब्द गुंफण्याचे तिच्या नशिबी नाही...
-- प्रदीप केळकर...

अर्थपूर्ण शब्द तुझे ओठी फुलतात सहजतेने...
कागदावर उमलतात सुंदर कवितांच्या रुपात...
दुखितांना देतात आनंद हसवितात पोट भरून...
आनंदी जीवनाचे रहस्य बहरते तुझ्या शब्दात...
-- प्रदीप केळकर....

हातावरील रेषा आपल्या सांगतील का भविष्य...
पाहिल्या असंख्य रेषा गोंधळ होईल मनाचा...
शहाण्यांनी लागू नये मागे हातावरील रेषांच्या...
उभ्या आडव्या रेषा दावती मार्ग आपुल्या दु:खाचा...
-- प्रदीप केळकर...

पैसे खाणारे अनेक आहेत आपल्यात...
पैसा देई मौज मज्जा धुंद करी मनाला...
अन्न ही खाणारे आहेत की आपल्यात...
अन्न देते आरोग्य शक्ती समाधान मनाला...
-- प्रदीप केळकर...

आपल्या हातावरील असंख्य रेषा...
घडवीत नाहीत आपलं नशीब कधीही...
आपलं नशीब घडतं बुद्धी अन कष्टानी...
प्रामाणिक कष्ट देती समाधान कधीही...
-- प्रदीप केळकर...

मागे वळून कधीही पाहू नका...
आत्मविश्वासाने पुढे जात रहा...
येणारी संधी कधी सोडू नका ...
मराठीचा अभिमान ठेऊन रहा...
-- प्रदीप केळकर...

आपली उचली जीभ लावली टाळ्याला...
अपशब्द बोलून दुखवू नये कोणालाही...
गोड बोलून आपणास जग जिंकता येत...
किमया हि शब्दांची फुलवावी बहरावीही...
-- प्रदीप केळकर...

Tuesday, November 1, 2011

मंथन च्या चारोळ्या भाग १

विरहाच्या वाटेवर...
हर एक अडखळलेला...
प्रेम करुन पुन्हा...
त्याच्याच प्रेमात पडलेला...
©*मंथन*™.. ३१/१०/२०११ रात्रौ ०१.२७

तुझी छेड काढताना....
तु नाक मुरडत जातेस..
नाक मुरडत जाता जाता...
एकदा मागे वळून पाह्तेस..
©*मंथन*™.. ३१/१०/२०११ रात्रौ १२.५४

बागडताना तुझ्या सवे...
हा वारा ही बागडायचा...
तु बोलायला लागलीस...
तो कोकीळ मंजूळ गानी गायचा..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.५८

तुला हसताना पाहून
रोम रोम माझे हसु लागले...
मांडीवर तू डोके ठेवताना...
क्षण ते बहरून आले..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.२३

डोळ्यात तुझ्या शोधत असतो..
माझ्या हरवलेल्या स्वप्नांना...
पापणी मागे लपविलेल्या...
तुझ्या त्या आसवांना...
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.१६

डोळ्यात तुझ्या पाहताना...
माझे प्रतिबिंब दिसले....
वेडे हे मन माझे..
तेव्हा तेथेच फ़सले...
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ १०.५०

मला हसायला आवडते...
तु सोबत असलीस की..
अन माझे हसू आवरत नाही...
तु रुसुन बसलीस की..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.०४

हसतेस तू खुळते एक कळी...
हसतेस तु हसते माझे नशीब...
हसतेस तू वाहतो गार गार वारा...
हसतेस तु तेव्हा येतेस माझ्या करीब..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११

माझ्याकडे रोखून पाहताना...
डोळे तुझे एकटक पाहायचे...
तुझ्या डोळ्यात पाहताना...
तुला पाहायचेच राहायचे..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११

मागे वळून पाहताना...
मस्त गोड हसायचीस...
त्या हसण्यातच मला..
पुढच्या भेटीसाठी आतुर करायचीस..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११




Saturday, October 22, 2011

संजय च्या चारोळ्या भाग ३ ..

तुझं ते निखळ हसणं तुझी ती मादक नजर
खुणावीत होती मला आणि माझ्या मनाला
येत होते आठवण मला तुझी हर एक क्षणाला...
*संजय**..

स्पर्श तुझा होता मला रोमांच उभा राहतो मनात
नजर मिळते नजरेला मन माझे भरून येते..
खेळच ग तो आपल्या दोघांचा...मनाचा...
*संजय**..

तुझं हात हातात घेताना
अजून कोणी तरी होतं तिथ
काय माहीत लोकांचं त्यात काय जात
चांदण्या पण लाजलेल्या तुझ्या माझ्या मिलनाला
लपून छपून त्या पण मनातल्या मनात हसलेल्या..
.*संजय**.

शब्द होते पण काव्य होत नव्हते
स्वर होते पण ताल जुळत नव्हते
तू आलीस बदलले माझे मन सुधा
खोटारडा असलो तरी तुझाच आहे...*संजय**..

तू भास नाहीस माझे सत्य आहेस
मनात असलेले तुझेच शब्द आहेत
तुझं प्रेम माझ्या शब्दातून दिसत आहे..
तुझ्याशिवाय माझे शब्द निघतच नाहीत...
*संजय**..

तू समोर असतेस
काव्य सुचते मला
तू नसलीस तर शब्द
पण रुसतात माझे..
*संजय**.

.कोजागिरीचा चंद्र सगळे
दुधात पाहतात...
मला नाही जमत ते..
तुला मी बस माझ्यात पाहतो....
*संजय**..

सूर तुझ्या पैंजणाचे
कानाला मदहोश करत होते...
स्वःतालाच काय पण
मला जगाला विसरायला लावत होते..*संजय**.

काल थांबलो मी तिथेच..
पण सुनामी तिथे आलेली ..
वाहणाऱ्या तुझ्या अश्रूत
मला वाहून गेलेली.....*संजय**..

तू लाऊन घेतली सवय ...
मला ते कधीच जमले नाही...
डोळ्यांचे पाणी कधी
बघ ना माझ्या हलले नाही...
शब्द परके झाले तुझे असे काही ..
ओठ माझे लवभरही हलले नाही ...*संजय**..

फुल पण आजकाल
प्रेम करायला शिकवतात..
मुर्झुन पण एका नव्या उमेदीनं...
उभं राहायला शिकवतात...*संजय**..

मनाच्या गहाराईत थोडेसे
झाकून थोडेसे पहायचेस..
मनाची चलबिचल माझ्या
दिसली असती तुला...*संजय**..

तू लोट्लेस दार मनाचे...
पण मन माझे तिथे नव्हते...
चोरून नेले कोणी तरी ते...
तुझ्याकडे तर ते नव्हते ?...*संजय**..

राख पण उरत नाही..
प्रेम कोणाचे जळल्यावर...
लोक आता दहावा पण होऊ देत नाहीत..
आज सरणावर चढलाय्वर..*संजय**..

तीर असा काही घुसला काळजात...
हु कि चू पण नाही करू शकलो...
थेंब असे गाळले रक्ताचे ...
कि बस नाव तुझेच लिहू शकलो ...*संजय**..

कसं रुसून चालेल पाऊसावर ...
माझ्या प्रेमाचं तो प्रतीक आहे...
तू जर नसलीस जवळ कधी...
सोबत तोच करतो माझी...*संजय**..

किंमत नाही केलेस माझी
मी तुझ्या जवळ असताना
आठवण येईल तुला पण ...
मी तुझा नसताना....*संजय**.

मनातून मागीतलीस तर
माफी पण मिळते...
माफीचे नाटक कधी
नाही येत कामाला....*संजय**..

उजाड रानात पण
सोबत तुझी हिरवळ देते ...
याच हिरवळीवर ....
प्रेम तुझे माझे फुलते...*संजय**..

श्वास तुझे अडले ...
माझे श्वास मी देईन...
अपेक्षा नसताना पण...
खूप काही करून जाईन...*संजय**.

.प्रेम हे मृगजळ पण असते...
प्रेम हे एक स्वप्न पण असते..
ज्याला मिळते तो जगतो...
बाकीचे नुसतेच जगतात...*संजय**..

कश्याला म्हणू मी सुख...
तू जवळ नसन्याला ?
कि अखंड या दुनियेत
माझ्या एकट्या असणायला ...*संजय**..

जीव जडला तिच्यावरी...
यात माझे काय चुकले..
दोघे अपुरे एकदुसर्यापरी..
प्रेमापुढे सगळेच झुकले ...*संजय**..

जन्म आणि श्वास सोबत असतात...
कवी आणि शब्द सोबत असतात...
बस जाणीव नसते त्यांना...
एकदुसार्याच्या अस्तित्वाची...*संजय**...

उन्हामध्ये उभी राहिलेस ..
पहा सावली तुझ्या सोबत आहे...
साथ अशीच असते प्रेमाची...
कळून पण न कळणारी...*संजय**..

एकदा उमटलेल्या पाऊलावर..
परत पाऊल टाकण्यात काही अर्थ नसतो...
हर्दयावर उमटलेल्या खुणा
अश्या नाही पुसता येत...*संजय**.

.सवय झाली तुला आता ...
वेळ देऊन वेळेवर न येनायची....
आता मी पण करत असतो copy
तुझ्यासारख्या बहाण्याची....*संजय**..

काही नाती अशी असतात...
तोडले तरी तुटत नाहीत...
प्राण कंठाशी आले तरी..
श्वास मात्र सुटत नाहीत..*संजय**...

दूर तुझ्यापासून जाताना ...
अश्रू माझे गळत होते..
तुला देलेले वचन कदाचित...
ते आजपण पाळत होते...*संजय**...

वाटी जळतात जसं माझ
मन जळत....
तेलही जळत, तूपही जळत
शेवटी काय उरतं...एक वाट तुझी ..* संजय**...

 जीवन सुरु झाले तुझ्यापासून..
शेवट त्याचा पण तूच आहे...
परतीची वाट बंद केल्यावर....
जीवन नावाला फक्त शिल्लक आहे...*संजय**...

भ्रम असतो मनाचा
मनातच ठेवावा लागतो...
काही जन आता
तुझ्याशिवाय पण जगतील..*संजय**..

तुझं लटक रागावणं पण...
मनाला उभारी देऊन जातं...
माझ्यावरील प्रेमाची
परिणीती देऊन जातं...* संजय

भेटीच्या अगोदरच तू
विरहाचे दुख देऊन गेलीस....
पोहता येत नव्हते मला म्हणून...
दुखाच्या समुद्रात ढकलून गेलीस..*संजय**..

असतात अश्रू पण काही मगरीची...
त्याला आपण ओळखायला हवे...
शब्द शब्द नाही राहिले माझे...
विष बनून स्वःताच पीत आहे...*संजय**...

जितका जपलो नात्याला ....
ती माझ्यापासून दूर गेली...
किंमत माझीच उलट शुन्य झाली...
त्यांचं अरेरावी पुढे .....*संजय**..

नुसती सवय जुळून काय उपयोग ..
मन पण जुळायला हवेत....
तुझं माझ प्रेम बघून...
शेजारी पण जळायला हवेत...*संजय**..

जीवन हे सुंदर असते
त्याला शिक्षा का समजावी...
प्रेम करावे त्याच्यावर....
जशी मरणावर पण प्रीत असावी..*संजय**..

जरा लेखणी ठेव बाजूला..
थोडसं जगायला पण हवं...
त्या तिकडे पलीकडे एक
वेगळं जग आहे....
स्वप्नाळू ...तुझ्यासाठी..
सजलेलं ...पाहशील ....* संजय**..

मरण हे नसते प्रत्येक
गोष्टीला उत्तर ...
निसर्गही त्याचे ऋतू
म्हणूनच बदलत असतो..*संजय **

असे खेळ खेळायला
देवालाच जमत आहे...
नाही होत विस्मरण तुझे.
हे का देवाला कळत नाही..*संजय**..

तिला पाहिलेलं कधी स्वप्नात ..
आज मी तिला डोळ्यासमोर पाहिलं....
भर दिवसा एका चांदणीला
या धरतीवर मी पाहिलं...* संजय**..

पण कोणी का रडव तुझ्यासाठी ....
बस
जगावं आणि मरावं बस तुझ्यासाठी ..... ...
* संजय**..


मी तिला म्हणालो....मी नाही बोलणार आता तुझ्याशी...
ना ही कधी फोन करणार ....
गालातल्या गालात हसली...
अन म्हणाली ...बरं झाले सुंटीवाचून खोकला गेला ....
* संजू**....

टाळी नाही ग वाजत...
कधी एका हाताने....
दूर करून स्वताच ....
वेळेचा बहाणा करणं....
* संजू **.



नात्यात आपल्या सुनामी पण येईल ...
असं मला पण वाटल नव्हते ....
ती आली अन बघ न .....
सगळ्यांना घेऊन गेली...
अगदी निरपराधांना पण....* संजू**..

एक हात माझा....तुझा हात हातात घेण्यासाठी....
एक माझं मन.....तुझं मन समजून घेण्यासाठी......
माझे बाहूपाश ...तुला कवेत घेण्यासाठी....
सांग ना ग मग ...हा तुझं रुसवा कश्यासाठी....* संजय**...

असं फेकून दिलेस ....
जशी चहातील आहे माशी..
अशी ग तू कशी....
केलीस माझ्या प्रेमाची ऐशीतैशी..
*संजय**..

ज्यावेळी मी तुझा विचार करत होतो....
मी माझ्या डोळ्यातला एक थेंब सागरात टाकला...
आणि मी शपथ घेतली कि मी तुझा तोपर्यंत,
असेन जोपर्यंत तो थेंब मला सापडत नाही...*संजू**..

हात ठेव आपल्या हृदयावर...
माझी धडकन ऐकू ऐईल तुला...
मग सांग ना ग राणी तरी ....
का आहे असा हा अबोला ....
सखे सोड ना अबोला ...* संजू**......

एक स्वप्न तुझं मी पाहिलेलं.....
एक आशा डोळ्यात मी पाहिलेलं.....
एक हात तुझा माझ्या हातात...
सांग ना ग कधी मिळेल हे सगळं...* संजय**....

मन दाटले होते ........पण शब्द फुटत नव्हते ....
नभ पण भरले होते काळ्या ढगांनी.......
पण पाणी असे बरसत नव्हते....
सांग ना ग का ? प्रेम नव्हते का तुझे माझ्यावर.....सांग ना....
* संजय**..

पावसात तुझ माझ्यासोबत असणं ..
हेच माझ्यासाठी खूप काही होतं...
त्यात तुझं चुंबन देणं म्हणजे तर....
नक्षत्राच एक सुरेख लेणं होतं..* संजय**....

सुरुवात का होत नाही दिवसाची तुला बोलल्याशिवाय .सांग न
फुल का फुलत नाही तुझ्या वेणीत लागल्याशिवाय .सांग न
सुगंध का दरवळत नाही तुझी चाहूल लाग्ल्याशिवाय ...सांग ना
सांगशील मला * संजय **..

येतात शब्द ओठावरती पण हात माझे हलत नाहीत...
एका तुझ्या आठवणीत अश्रू पण ढळत नाहीत......
कशी लिहिणार मी कविता पान माझे ओले झाले....
एक तुझ्या आठवणीत मन चिंब चिंब झाले *संजय**...

एक तिच्या अस्तित्वाची छत्री
आज माझ्या हाती होती......
आठवणींचा पाऊस झेलत मला,
पुढे घेऊन चालत होती......* संजय**...

किती सुंदर असत ना..कोणी तरी आपल्यावर प्रेम करणं ...
किती सुंदर असतं ना ...कोणाच्या तरी स्वप्नात हरवून जाण...
किती सुंदर असतं ना ...कोणी तरी आपल्या दुखावर फुंकर मारण..
खरेच किती सुंदर असतं ना ..* संजय **...

कधी तरी येतेस ...कधी तरी जातेस..
मन बैचेन असते अगदी...मनाला हुरहूर का लावून जातेस......
का ग अशी का करतेस सांगशील का ?..
...* संजय **....

रक्ताचा तो सडा निसर्गाने पण पहिला....
त्याच्या डोळ्यातून पण मग अश्रूंचा पूर वाहिला........
दुख करता करता त्याचे बोलायचे राहून गेले....
आणि सरकार म्हणते सगळे पुरावे वाहून गेले......
.....* संजय **.....

नाती हे असेच असतात ..बस असून नसल्यासारखी ........
खूप जवळ वाटतात पण असतात खूप खूप पारखी....
पण एकाच नातं असं असत...अगदी निर्भेळ .....सुंदर
तुझं नि माझं ...आपल्या मैत्रीचं ....खरे न ग .........* संजय**.....

एक स्वप्न डोळ्यातच बसवले मी...
मनातच मनाला हसवले मी .....
वेदना या मनाला ही उमटली किती....
डोळे तुझे सुजलेले बघितले मी...* संजय

कधी कधी ना मला
चाकोरीबाहेर पण जायला आवडतं..
नाहीस माझी तू पण तुझं
बनायला पण आवडतं .....*संजय**..



सुप्रिया च्या चारोळ्या भाग २..




















गेलेले ते दिवस.....
नाही येत परत....
तुझ्या त्या सहवासात मन होते रमत....
गेले ते दिवस पण आठवण नाही सरत....
सुप्रिया.
08.10.2011

शब्दांची रास.......
तुझा तो सहवास....
तू नसताना हि मग तुझा तो भास.....
घेऊन जायचा मला तुझ्या शब्दांच्या राज्यात हमखास.......
सुप्रिया.
10.10.2011

तुझ्या शब्दांत गुरफटून जाणारी....
तुझ्या मिठीत विरघळून जाणारी ....
तुला माझ्या मनात साठवून ठेवणारी.....
तुझ्या आठवणीना सदैव कवटाळून बसणारी....
सुप्रिया.
10.10.2011

कोजागिरीचा चंद्र जणू तुझाच एक भास....
आजची हि रात्र सजणार आहे तुझ्यासाठी खास.....
त्या चंद्राच्या छटेमधला तुझा तो सहवास.....
उगवणार आहे चंद्र जणू माझ्यासाठीच आज....
सुप्रिया.
11.10.2011

गम्मत-गम्मत म्हणून मला एकटक पाहत राहायचं.....
मग मी हि तुला माझ्या नजरेत साठवायचं.....
वेळेचे भान हरवून मग जायचं....
मी निघाले कि लगेच तू रागवायचं.....
सुप्रिया.
12.10.2011

सख्या काल तुझी आठवण झाली पावसात एकटच भिजताना.....
किती वेडे होऊन जायचो आपण एकत्र पावसाचा आनंद लुटताना....
क्षणीक होता रे आनंद तो पावसाचा थेंब अंगावर झेलताना....
खरच काल पण कुणालाही कळलं नसेल रे मी पावसात रडताना.....
सुप्रिया.
14.10.2011


चारोळीतील एक ओळ तुझ्याचसाठी खास...
एकदातरी प्रेमाने पाहावे माझ्याकडे हि एकच आस.....
म्हणतोस तू....माझ्या आठवणी तर आहेत फक्त एक भास.....
माझ्या या प्रश्न-मंजुषेमध्ये नेहमीच तूच का होतोस रे पास...???
सुप्रिया.
14.10.2011

Thursday, October 13, 2011

प्रदीप काकांच्या चारोळ्या

तुझ्या शब्दात कधी गुरफटून न जाता...
शब्दातून सुंदर शब्दच फुलविणारी मी...
तुझ्या अर्थपूर्ण शब्दांनी आज गुरफटले...
राहिले नाही भान खर तेच बोलून गेले मी...
-- प्रदीप केळकर...

तुझ्या शब्दात कधी गुरफटून न जाता...
शब्दातून सुंदर शब्दच फुलविणारी मी...
तुझ्या अर्थपूर्ण शब्दांनी आज गुरफटले...
राहिले नाही भान खर तेच बोलून गेले मी...
-- प्रदीप केळकर...

करुनी प्रिती बेडी पडली लग्नाची...
फुलली प्रित स्पर्शातूनी सुखावली...
डाव साधला नियतीने लागली नजर...
अबोल जाहली प्रिती मने ही दुखावली...
-- प्रदीप केळकर...

वाढविले बीज तुझे माझ्या पोटी...
दिला जन्म मी मोठ्या स्वकष्टाने...
शिकवूनी उभा केला त्यास जिद्दीने...
पित्याचेही प्रेम दिले पूर्ण जाणीवेने..
-- प्रदीप केळकर...

दिसत होते तुझ्यातील गुण लग्नाआधी...
भाळलो होतो ना तुझ्या त्या सुंदर रूपावर...
संपलं आकर्षण लागले दिसू एकेक अवगुण...
विटली मने कसा ग संसार करू तुझ्या रूपावर...
-- प्रदीप केळकर...

जन्मदात्रीची घेईल काळजी तो विश्वेश्वर...
संतोषली माय जाई पुत्र शिकण्या परदेशी...
नियतीचा हा खेळ अजब धन्य झाले जीवन...
करण्या सेवा मातेची येईल तो पुत्र मायदेशी...
-- प्रदीप केळकर...

Tuesday, October 11, 2011

मजेदार चारोळ्या: चारोळीला चारोळीने उत्तर - भाग २

असतात काही झुडपे
चार महिन्याच्या पावसात जगणारी
असतात काही माणसे माझ्यासारखी
आयुष्यभर नुसत्या आठवणीत जगणारी
रेशु ०९/१०/२०११ रात्री १०.३०

    
नुसत्या आठवणीत जगून
काही मिळत नाही
जीवनात ठेवले आहे काय
एका प्रेमाशिवाय....

तुझ्यासाठी आठवणी तरी आहे
माझ आयुषच जणू एक मृगजळ आहे
भास आहे केवळ तेथे कोणीतरी असण्याचा
कंटाळा आलाय आता सारखा भासात फसण्याचा
लक्ष्मीकांत

सोडा मृगजळाच्या मागे धावणे
स्वतःतला कस्तुरीमृग शोधा
जीवन हे क्षणभंगुर नुसते
भंगाशिवाय मिळणार काय दुसरे..
*प्रेम*

मला मृगजळाच्या मागे नाही
सोबत धावायचं आहे
भंगलेलं ते स्वप्नं
परत एकदा जोडायचं आहे
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.०४

जोडणारे स्वप्न पाहत
आयुष्य निघून जातं
मृगजळ शेवटी मृगजळच राहत
नसते कोणाचे ...कोणाशिवाय ..
*प्रेम*

मान्य आहे मला
मृगजळ मागे धावणं योग्य नाही
पण डोळ्यात माझ्या सामावलेलं
स्वप्नही एवढा छोटं नाही .......
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.१५

डोळ्यांची स्वप्न आजकाल
चष्म्यासारखी बदलतात
आज एकासोबत तर
उद्या दुसर्यासोबत फिरतात..
*प्रेम*

स्वप्न असुदे डोळ्यात तुझ्या
पूर्ण करण्याचा हट्ट नको
प्रयत्न असू दे तसा
पण स्वप्नात जगण्याची सवय नको
लक्ष्मीकांत

हसू नका असे ,सत्य आहे
सत्याचा सामना करा
खरे प्रेम शोधा स्वतात
मग पारखून प्रेमाचा स्वीकार करा ..
*प्रेम*

सत्य हे कटू असते...
त्याला हसुन करू गोड...
सत्यातली सत्यता घे जाणून...
कधी कधी त्यालाही असत्याची जोड..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.२७

प्रेम आणि असत्य
कधीच सोबत असू शकत नाही
मग शेवट काय होणार त्याचा
अगदी ठरलेला...
*प्रेम*

हा हा हल्ली असत्यालाच
१००% सत्य दर्शवतात
प्रेमाचे काय घेवून बसलात
गल्ली बोळात प्रेमाचे खोटे चाळे चालतात
रणजीत..११.३६रात्री ०९/१०/११/

वेड्या असत्य आणि प्रेम यांच
अतूट अस नात
असत्याचा हात धरला तरच
आजच प्रेम टिकत
लक्ष्मीकांत

प्रेम आणि चाळे म्हणजे
मन आणि वासना
कोणी काय करायचे
ज्याचे त्याने ठरवावे....
*प्रेम*

सगळे असाच विचार का करता तुम्ही ???
कुणाचाच का प्रेमावर विश्वास नाही राहिला
खरा प्रेम करून तर बघा आधी
तुमच्या सत्य असत्यात प्रेमाचा पण जीव घुसमटला
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.४०

प्रेम म्हणजे आजकाल
फळाप्रमाणे झाले आहे...
ऋतूप्रमाणे ते पण
नेहमी बदलत जाते ..
*प्रेम*

आजची परिस्थितीच अशी
खरे खोटे काय समजत नाही
जिकडे तिकडे अनैतिक चाळे सगळे
खरे प्रेम मिळणार तरी कोठे....
रणजीत..११.४३रात्री ०९/१०/११

आजकाल तर असत्य असलेलेच
प्रेम टिकू शकते
कारण खऱ्या प्रेमाची
कोणालाही जाण नसते !!!!
*आशीष*

प्रेम...? आईने केलेले ते..?
की बाबांच्या धाकामागे लपलेले...
प्रेयशी ने केलेले प्रियकरावर...
पण ते ही समाजाच्या जाळ्यात गुरफटलेले..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.४७

प्रेम, प्रेम आज उरलाय कुठे??
प्रेमाचा आणि त्यागाचा संबंध आता राहायलाय कुठे?
उठतोय सुटतोय तो प्रेम करतोय
घरचे नाही म्हटले तर प्रेमाला सोडून देतोय..
लक्ष्मीकांत

असेल खरे प्रेम तर
समाजाशीपण लढता येते.
पण समाजाच्या नावाखाली
प्रेमाचा बाजार सगळा.
वापरले अने फेकून दिले..
*प्रेम*

प्रेम म्हणजे प्रेम असत
सत्य असत्या असं त्यात काहीच नसतं
त्या अनैतिक चाल्यांमध्ये सुद्धा
त्या दोघांच एकमेकांवर प्रेम असत
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.५०

नुसता बाजारूपणा
प्रेमाच्या नावाखाली
स्वतःतर बरबाद
पण दुसर्याला हि कलंकित करे
रणजीत..११.५३रात्री ०९/१०/११/

प्रेम म्हणून चाळ्यांना
प्रेमाचे नाव नको देऊस
असत्यावर आधारलेले
प्रेम ते कसले...
*प्रेम*

खरे प्रेम तेच जे...
मनात वसलेले असते...
नियमांना तोडून जे...
निरंतर टीकून राहते..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.५६

आजकाल प्रेमाची संकल्पनाच बदललीये
भावनांची जागा आज चाळ्यांनी घेतलीये
विश्वास होता एके काळी
आता लाजेचीही झालीये होळी.
लक्ष्मीकांत

तुझं माझं प्रेम...
आपल्या मैत्रीतच वसलेलं...
तु हाक मारलीस अन...
मी अचुक ऎकलेलं
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.५९

हाक नव्हती ती तुझ्यासाठी..
तो एक तुझा भास होता...
हवेतून आला कानापार्येंत
आणि विरून गेला....PP
*प्रेम*

तुला भारीच सवय...
मना मध्ये बोलायची..
मी समोर असलो..
माझी पण व्हायची गोची..
©*मंथन*™.. १०/१०/२०११ रात्रौ १२.०५

जाते आहेस तर जा
पुन्हा या प्रेमाच्या बाजारात नको येउस
अशाने आयुष नाही घडायचे
यात च मी माझे अमुल्य क्षण गमावले
*** आशिष ***
मनाची भाषा कळायला पण
मन असावं लागतं
मोकळ्या मनानं बोललीस
तर कळले असते मला..PP
*प्रेम*

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.०५

अर्थ मनात असतो
नाही शोधलास कधी तू
नाही बोललीस तरी
डोळ्यांची भाषा कळते मला...PP
*प्रेम*

न बोलण्याने गुंता कधी सुटत नाही
भावना व्यक्त होण्याच्या थांबत नाही
शब्दांची साथ नसेल कदाचित
संवेदना खुलल्याविना राहत नाही
लक्ष्मीकांत

तुझ्या येण्याची चाहूल...
देऊन जातो हा वारा वाहणारा...
अन तुला भेटायचे म्हणून...
तो उडालेला माझा गोंधळ सारा...
©*मंथन*™.. १०/१०/२०११ रात्रौ १२.१३

गोंधळ तुझा उडाला
तिला ते सवयीचे होते
फुलपाखरुच होते ते
उडाले या डालीवरून
दुसर्या डालीवर....PP
*प्रेम*

 तुझ्या सोबतच्या पाऊलखुणा
शोधतच राहीन मी
अजूनही आस आहे तुझ्या पावलांच्या परतीच्या वाटेवर
माझ्या किनार्यावर परतणाऱ्या प्रत्येक लाटेवर
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.२०

लाटा येतात लाटा जातात
लहान आणि मोठ्या पण
प्रत्येक वेळी नवनवीन
रुतलेल्या खुणा तुझ्या
वाहून गेल्या लाटेसंगे ..PP
*प्रेम*

येईन पुन्हा मी तुझ्या किनार्यावर
पण हवी आहेस मला तू, पुन्हा त्याच वळणावर
भेटलो होतो त्यावेळी आपण तसे
हातात हात नसूनही एकरूप होतो जसे.
लक्ष्मीकांत

मी वाहवत गेलो खूप दूर
तुझ्यामुळे
तू राहिलास किनार्यावर
तर मी दुसर्या किनार्यावर...
न भेटणाऱ्या ....
*प्रेम*

किनार्याच्या लाटा काय रे
येतात आणि जातात तरी
माझ्या मनातून तू जात नाहीस
शब्दातून तू जरी गेलास तरी
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.३०

मन असते काय ग
कोणावरही जडतं
शब्द सुटतात तीरासारखे
घुसतात काळजात अगदी
खोलवर....कधीही न संपणारे ..
*प्रेम*

जेव्हा मी वही पेन घेऊन बसते
तेव्हा मला शब्दच नाही सुचतात
पण रोज रात्री तुमच्या सोबत या मैफिलीत
चारोळ्यांचा थरवर थर रचतात
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.४१

वही आणि पेनाचेपण बघ ना
असेच असते एक भरत जाते
तर दुसरे संपत जाते....
बस थर निर्माण होतात आठवणींची तुझ्या......
*प्रेम*

शब्दांच्या साठी साठी वही पेनची गरज काय
शब्दांचे आकाश आहे खुले
शब्दांचे सारे तारे येथे
भावनांच्या साथीने होतील त्यांची फुले
लक्ष्मीकांत

खुल्या आकाशातच प्रेम
तुझे खुललेले
आज कळी उद्या फुल झालेले
अन तुटून मुर्झुन गेलेले...प्रेमाशिवाय....
*प्रेम*

सवयच विकृताना जे चांगले चालले ते
उध्वस्त करण्यासाठीच आयुष घालवले त्यांनी
दुसर्यावर टीका करण्यात चांगले काय जमले नाही
म्हणून असे उदोग चालवले
*रणजीत*

या सगळ्या भाऊगर्दीत
माझं प्रेम हरवून गेलं
सांगायचं होतं तिला काही तरी
सांगायचं राहून गेलं ..
*प्रेम*

Sunday, October 9, 2011

मजेदार चारोळ्या: चारोळीला चारोळीने उत्तर..

तू जाऊच शकत नाही
माझ्यापासून दूर
शब्न्दात माझ्या असा गुरफात्लास कि
आता तुला ते सोपं नाही ..सोपं नाही ..सोपं नाही ..
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.१५

जावे तर सगळ्यांनाच लागे
हा तर खेळ नियतीचा
क्षणिकच तू अन मी
यात गुरफटणार तरी मी कसा
रणजीत...रात्री ०३.०६)०९/१०/११

नात तुझं माझं,
एका क्षणभराचा !
अन त्याच क्षणात
लाख जन्म जगणाऱ्या अमृती जीवनाचं !!
रेशु ०९/१०/२०११ रात्री 3.३२

नात तर सांगते
अन दुसर्याच क्षणाला
मला हरवण्याचा गोष्टी तुझ्या
अमृत ते हि विषासमान वाटे ....
रणजीत...रात्री ०३.३६)०९/१०/११

तुला विष वाटो व अमृत
मला जिंकण्याचं वेध लागलाय आता
जसा मेलेल्या
आत्म्याला जगण्याचा आकर्षणाचा !!
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.४८

हडळीसारखे वागणे तुझे
जिंकण्यासाठी आंधळीच झालीस तू
हे ना कळे तुला जिंकली जरी तू
हरण्याचे दुख: ना आजतागायत मला
तुझ्या चेहऱ्यावरच्या हास्यात आनद तो मजला....
रणजीत...रात्री ३.५६)०९/१०/११

या मांडलेल्या खेळाच्या बाजारात
तू बोलतोस तुझी जीत आहे
खर तर तू तुझ्या मनाला विचार
जिंकून काहीतरी नक्की हरलायस तू
रेशु ०९/१०/२०११ रात्री ४.०५

आज थांबलो आहे जिंकून हरण्यासाठी
पुन्हा नाही थांबणार शब्दांचा खेळमांडण्यासाठी
अस्तित्वासाठीच जगडतो आहे आजही
म्हणून तर मृगजळसारखे जगणे मला नाही जमणार.....
रणजीत...पहाटे ०४.२१)०९/१०/११

तुझ्यात स्वत:ला,
बघत होते मी.
तुझ्यात मन माझे,
शोधत होते मी.
आता तुझ्या जिंकण्यात
स्वताला हि हरवले मी
रेषु ०९/१०/२०११ रात्री ४.२५

असे माझ्यात तुझे
बघणे ते कसे म्हण्याचे
अंता पर्यंत वाट पाहायाची
अन शेवटी तूच हरलास
असे दाखवून जयायचे....
रणजीत...पहाटे ०४.३०)०९/१०/११

दिलेली भेट प्रेमाची असते, तागडीत तिला तोलू नये
खोक्यावारल्या खोडलेल्या किमतीचा अंदाज कधी करू नये
जेव्हा जगन हा एक भार असतो तेव्हा शब्दांचाच आधार असतो
म्हणून तू आणि मी जिंकलो आहोत का हरलो ते कृपया सिद्ध करू नये
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.३७

थांब थोड बोलायचे आहे
असे म्हणून कोणी आईकून
घेत नसे कोणाचे
जीवनात हार जीत महत्वाचे नाही रे
हसत जगत असताना चार शब्द प्रेमाने बोला रे
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ४.४०)

मुलगा चार शब्दांच आयुष कधीच नसत
सा-या शब्दात आयुष्य घुत्मल्त
हवी असते एखादी गोष्ट जेव्हा
आयुष्यच आपल्याशी दगा करत
लक्ष्मीकांत

अरे मना.. तू अजुन बेचेंन का?..
प्रेमाच्या जखमा अजुन भरल्या नाहीत..
तरी त्याची ओढ का????
काटेरी एकाकी रस्त्यावरून चालताना...
फुलांच्या पायघद्यांची स्वप्न का??????
आयुष्याची मिळालेली वाट एकटीने,
चालायची अस समजून सुद्धा...
कोणाचा सोबतीची आस का????? -
आयुष्यात हरलेय पूर्णपणे,
तरी जिंकायची आस का ???????????
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.४९

मी नाही हरलो
नाही माझे प्रयत्न हरणार
माझ्या बरोबर
तुम्हाला हि जिंकावेच लागणार
रणजीत.....१५/०८/११/ (रात्री १२.१०)

हरू नकोस इतक्यात
जगण आयुष्या पेक्षा मोठ आहे
थांबू नकोस आता
खड्ड्यांची हि सुरुवात आहे
लक्ष्मीकांत

भूतकाळात कासवाला कमी लेखले
आळसाने सस्याला हरवले..
पण,आज कासव जिंकले नाही
कारण,ससा वाटेत ’झोपला’ नाही..
अरे,ससा आता कधीच हरणार नाही
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.५५

भूतकाळातील चुका तू सुधरशील
हे खरे जरी एकदा तू हरले
पुन्हा हट्ट करू नको जिंकण्याचा
काय सांगावे कासवामुळेच हे धाडस तुला आले...
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.००)

हुश्शश्श्श्स, झाले शांत सगळे
गेले सारे रातकिडे
जगणे संपल्यावर कळले
मृगजळा मागे धावणे व्यर्थ आहे
लक्ष्मीकांत

ना जिंकण्यासाठी ना हरण्यासाठी
शब्द देऊनच शब्द घेतो आहे
शब्दच्या देवाण घेवानेच तरलो आहे
घड्याळाकडे लक्ष ना कोणाचे
तू मी शब्दांचा खेळ खेळतो आहे
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.०६)

धाडस मला भूतकाळातील चुकानेच आले
पण जिंकण्यासाठी cheating नाही केली खेळात
आजही परत मी जिंकता जिंकता हरले
कशी नशीबाने परत थट्टा माझी मांडली या काळात
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.१४

तुझ्या धाडसाला सलाम माझा
पण अनाधिकृतपणे खेळ ना खेळलो मी कधी
तू तर हरवण्यासाठी खेळतेस आणि मी जिंकवन्यासाठीच
म्हणून तर तुझी थट्टा तूच करतेस.......
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.२२)

हातात हात देती, तू चालशी पुढे अन्
अर्ध्यावरुन मागे वळतात लोक येथे
सोडून एक‌‍ट्याला पळतात लोक येथे
दुसर्यांना हरवण्यासाठी डाव मांडतात लोक येथे
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.३३

हात आपण सोडतो, नावे लोकांना ठेवतो
डाव हरण्या जिंकण्यासाठी कधीच नसतो
तुलना करून आपणच त्यामागच समाधान जाळतो
लक्ष्मीकांत

हात देऊन मागे खेचणे ना जमले मला
आता पर्यंत मदतीचा हात देतो आहे लोकांना
तेच लोक हरण्या जिंकण्याची भाषा करतात
चार चोघात मलाच परके करून
स्वतःच माझ्या पाठीत खंजर खुपसतात..
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.३६)

आपल्यासाठी परके कोणीच नसते
आपणच आपल्यासाठी परके बनतो
चार चौघांच्या प्रतिष्ठे पायी
आपणच आपलेपण गमावतो.
लक्ष्मीकांत

आता सगळं संपलय,
उठलाय खेळाचा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
आता माळ आसवांची
पाहतेय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार
नाही कुणाच्या - साथीची
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.५०

वाट पहाणे हेच तर जीवन आहे
साथ घेण्यापेक्षा देण्याला महत्व आहे
झाल असत जर सगळ वेळे आधी
म्हटल असत मग आता जगण्यात काय मजा आहे .
लक्ष्मीकांत

आता खर असं वाटतेय कि
मी जिंकुनही हरले तू हरुनही जिंकला
मला खुप गर्व होता माझ्या शब्दांवर
आता तेच शब्द फ़क्त हसुन पाहत आहेत माझ्यावर
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.००

खूप खेळ खेळलो चारोळ्यांचा
वाटे कधी ना थांबो हा खेळ चारोळ्यांचा
पण तू अशी साथ ना कधी देणार
ना मला हौस जिंकण्याची
मला तर हौस दुसर्यांना सुखी पाहण्याची
म्हणूनच तुला जिंकवण्या करीता
केलेल्या चारोळ्या पुन्हा खोडतो मी....
तुझ्याच चारोळ्या जास्त तुलाच दर्शवतो मी....
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.५६)

शब्द आहेत ते
कधी न रुसणार कुणावर
मायेने गोंजारा त्यांना
नेतील ते एका सुंदर वळणावर
लक्ष्मीकांत

शब्दही उरले नाहीत आज सांत्वनाला !
अर्थ कधीच नव्हता त्या माझ्या शब्दांना !
एकदाच ये एकदाच माझ्यासाठी ,
यायचे न मी तुला पुन्हा कधी विनवायला !!!!!! !
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.१२

इतक्यात तू कशी हरली
बाजार तो कसला
मानतेस हा तर खेळ शब्दांचा
दुख: सोबत एकटेपणा आले तुझ्या वाट्याला
आम्ही असता तुझ्या सोबतीला
हसतात हसतच आले असतील ती आसवे
उगाच त्यांना दुखाचे नाव नको देऊ
आस ती डोळ्यात असवी नव्याची
पण साथ तुझी मी अजून सोडली नाही
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ६.१४)

हे ते पहा सूर्य उगवतो आहे
कदाचित त्याला हि घाई झाली असावी
शब्दांचा खेळ हा पाहणायची
आम्ही थकलो नसून
जागेच आहोत तुझ्यासाठी
हे सांगायचे आहे मला हि
०९/१०/११. (पहाटे ६.२६)

अखेर तू मला सोडून गेलास ,
भन्नाट वादळी वा-याप्रमाणे.
मी तुझ्या प्रेमात वेडी झाले ,
पण ते प्रेम तु पायदळी तुडवून गेलास ,
दिलास नकार मजला आणी,
परका करून गेलास .
जिंकून सवॅकाही
इथेच मला कायमचा हरवून गेलास
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.३०

हि घाई तर तुलाच
मला सोडून जाण्याची
वादळा समोर नतमस्तक होण्याची
आले प्रसंगात साथ न देताच
मला खोटे ठरवण्याची
जिंकणार तरी तू कशी
तुही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी....
०९/१०/११. (पहाटे ६.३६)


तू जिंकण्यासाठी स्वतःला हरवत गेले मी ..
स्वतःचे अश्रू विसरून तुला हसवत गेले मी ...
वाटलं होता थांबवशील मजला ..
नकळत स्वतःला एकट टाकून गेले मी ..
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ०६.४३


मी ना आस धरली जिंकण्याची
पण एक बरे तू हसण्यास लागली
आता हरून देखील जिंकलीस
मग तू एकटी कशी म्ह्नायायची.......
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ६.४६)

Wednesday, October 5, 2011

विपुल च्या चारोळ्या भाग २

नाते  जोडताना  कधी  तरी
प्रथम  शपथ  घ्या  त्या  नात्या ची
दुनिये  मधून  जरी  निघून  गेलो 
तरी  साथ  आहे  आपल्या  सात  जन्माची
विपुल


मी कधीच कोणाचा नव्हतो
पण जेव्हा तुला मी बघितले
मी माझा कधीच झालो नाही
वारा जसा फिरतो तसा फिरत राहिलो
आणि तुझी सावली शोधत राहिलो
विपुल .

मी नेहमी च तुझ्या अवती भवती असतो
फरक फक्त एवढाच होता कि तु होतीस
त्या वाटेवरती माझी नजर नाही गेली
विपुल

डोळ्या मधुन किती भाषा बोलणार
जसे डोळे फिरवशील तसे ती
भाषा बदलणार, प्रेमाची भाषा
शिकुन घे आणि मग डोळ्या
मधुन प्रेम व्यक्त कर
विपुल

मी लावले आहे तुझ्या माझ्या दोस्ती चे रोपटे
त्याला तुझ्या मायेची गरज आहे
माया जरी दिली नाही तरी चालेल
पण तुझी छाया त्याच्या वर पडली पाहिजे
विपुल

त्या नात्या ला किमंतच नव्हती
उधारी चे होते ते नाते फसवे होते
आशा होती मनात पण तिला
वाटायचे सांगावे येऊन माझ्या कानात
विपुल

सुन्न हो खन्न हो पण शुन्य होऊ नको
ती येईल तुझ्या साठी परत
रडु नको तिझ्या साठी परत
मी सांगणार नाही तुला परत
आपला राम आणि आपला च भरत
***विपुल...,

कुठे जाशील तु दुरावा करून
परत येईचे आहे तुला इथेच फिरून
मग जाऊ नकोस तु परत
भेटण्या चा बहाणा करून
**विपुल**




दाशु च्या चारोळ्या...

 माझी लेखनी मज बोलते      
का रे, तू कवितेच्या एतुका पाठीशी,      
मी बोललो, अग लेखनी रानी      
कवितेविना तू ,      
तुझ लक्ष बर कशी गाठशी??      
      
अंधार फार झाला      
दिवा जपून ठेवा      
असतील हृदयी, पनत्या जरी खुप      
दिवाळी येतेय,      
आपणास शेभेछा खुप खुप      
      
तुझ्या भिर भिर नाऱ्या डोळ्यांवर      
आता माझा विश्वास राहिला नाही      
खोट बोलतेस तू माझ्याशी      
प्रेम असून देखील      
      
डोळे अन शब्द      
बिनचूक बोलतात तुझे      
फक्त साहस चुकतो तुझा      
प्रेम व्यक्त करायचा       
      
स्वप्नांना जाग आली माझ्या      
गेलीस जेव्हा दूर तू      
शब्द हि कोरडे झाले माझे      
जेव्हा संपली दवूत      
      
परंपरा समजून जपतोय      
तिला मीच आपलंस करतोय      
अन ती नादखुळी      
परंपराच तोडतेय       
      
प्रेम होत नाही      
याचे त्याचे बघून      
करावे लागतेच ते      
झाडाच्या पाठी लपून      
      
ममतेच्या कर्तुत्वाला कधी भुलणार नाही      
अन आई विनाच काय तर      
पित्याविना देखील      
कधी एकटा राहणार नाही       
      
मी :-जाळणे घर कुणाचे,      
वाईट का बर नाही??      
ती:- असते वाईट जर      
घर जाळणे कुणाचे      
नसती जाळली असती      
मारुतीने लंका रावणाची      
      
जसा उठलो झोपेतून तसाच      
तुझ्या प्रेमात पडलो      
अन आई म्हणाली कार्ट्या      
पडलो नाही पडले      
"अरे तुला स्वप्न पडले"      
      
तीच ती.......................!!      
शाळेच्या दिवसात उशिरा यायची      
... अन संगे माझ्या      
शेवटच्या बाकावर बसायची      
      
अन, तीच ती...................!!      
कॉलेजच्या दिवसात लवकर यायची      
अन संगे माझ्याच      
शेवटच्या बाकावर बसायची      
      
मज वाकोल्या दाखवून ती      
तिचे प्रेम व्यक्त करीत होती      
अन आसुलेल्या चेहर्याला      
आरसा (तिचाच चेहरा) दाखवत होती      
      
शब्द सुचत असताना मला      
तिची आठवण नक्कीच होते      
अन वेड्या वाकड्या शब्दांना      
तिची मदत सहज होते       
      
वळणाची भाषा सख्या      
कधी कळली असती तुला      
वाट सोडूनी तीच      
तू त्याच वाटेला नसता गेला   
**दाशु**

मंजुषा ताई च्या चारोळ्या.

आत्मिक नात्यांचे मोल ..
सामान्यांना काय कळणार ..
दूर झाले असले तरी ..
अखेर एकमेकांनाच मिळणार ...
मंजुषा

एकनिष्ठ आहे तुझी सखी ..
कधीच नाही चळणार...
वचने तुला दिलेली ..
नेहमीच पाळणार..
मंजुषा

रोखून माझ्याकडे असे ...
काय रे बघतोस ...
कि नजरेनेच नुसते ..
पिवून टाकतोस ...
मंजुषा

तुला काय वाटल ..
तुझ्या जाण्याने जग माझ संपल .
तुझ्याशिवायही राहाण .
मी केव्हाच शिकलं..
मंजुषा

खूप मोठी चूक केलीस ..
मला सोडून जाण्याची ..
वाटच बंद करून टाकलीय ..
मी तुझ्या परतीची ..
मंजुषा

तूच तर होतास ..
माझ्या कवितेची प्रेरणा ..
तुझ्या पश्चात शोधावा लागतो ..
नित्य नवा बहाणा ..
मंजुषा

आहेस का रे तुही सुखी ..
माझ्यापासून दूर जावून ..
माणसांच्या या अफाट गर्दीत ..
मला एकटीला लोटून ..
मंजुषा

कवीनेच त्यागले ..
तर कवितेने काय करायचे ..
श्वासांना (शब्दांना ) तिच्या ..
कोठे शोधायचे ????????
मंजुषा

संजय च्या चारोळ्या..भाग २

भावना काय असतात ग ...
शब्द असतात अंतरीचे ...
काही मला समजलेल्या ...
काही तू समजून घेतलेल्या ..
*संजय**..

नवरा उतावळा होता
गुडघ्याला पण बाशिंग होतं..
पण मन चंचल तुझं...
नाही समजू शकले त्याला ....*संजय**..

कोरे पुस्तक पण आता
खूप काही मांडून जात....
न वाचताच बरेच काही सांगून जात..
लिह तू दोन शब्द सखे
सखे आता माझ्यासाठी...
सुरु होईल वाट पण तुझ्या प्रीतीची..*संजय**...

नातं नव्हते तुझे माझे काही...
पण मला तुला भेटायचे होते...
एक निखळ मैत्रीण कशी असेन ...
तू नाही तुझे मन पहायचे होते...*संजय**

दूर तुझ्यापासून जाताना ...
अश्रू माझे गळत होते..
तुला देलेले वचन कदाचित...
ते आजपण पाळत होते...*संजय**...

काही नाती अशी असतात...
तोडले तरी तुटत नाहीत...
प्राण कंठाशी आले तरी..
श्वास मात्र सुटत नाहीत..*संजय**...

प्रत्येक वेळी विष पिऊन ..
कंठ निळा होत नाही...
निळे पडले शरीर माझे...
प्राण त्यात उरले नाही...*संजय**..

वाटी जळतात जसं माझ
मन जळत....
तेलही जळत, तूपही जळत
शेवटी काय उरतं...एक वाट तुझी ..* संजय**...

सवय झाली तुला आता ...
वेळ देऊन वेळेवर न येनायची....
आता मी पण करत असतो copy
तुझ्यासारख्या बहाण्याची....*संजय**..

कश्याला म्हणू मी सुख...
तू जवळ नसन्याला ?
कि अखंड या दुनियेत
माझ्या एकट्या असणायला ...*संजय**..

कश्याला म्हणू मी सुख...
तू जवळ नसन्याला ?
कि अखंड या दुनियेत
माझ्या एकट्या असणायला ...*संजय**..

जन्म आणि श्वास सोबत असतात...
कवी आणि शब्द सोबत असतात...
बस जाणीव नसते त्यांना...
एकदुसार्याच्या अस्तित्वाची...*संजय**..


जीव जडला तिच्यावरी...
यात माझे काय चुकले..
दोघे अपुरे एकदुसर्यापरी..
प्रेमापुढे सगळेच झुकले ...*संजय**...

उन्हामध्ये उभी राहिलेस ..
पहा सावली तुझ्या सोबत आहे...
साथ अशीच असते प्रेमाची...
कळून पण न कळणारी...*संजय**..

कृष्णा च्या चारोळ्या..भाग २

तुला मनातले कसे सांगाव,
कुणालाही न समजत तुलाच ते कालाव....
चारोळीतील माझ्या  मर्म,
फक्त  तूच... जाणाव....
@कृष्णा

सखे सांग मला ,
असा  काय केला  मी  गुन्हा ,
तूच ठरविलेस मला गुन्हेगार. .
अजूनही करतोय तोच विचार...
@ कृष्णा

गुलाबी स्वप्नात आले
एक गुलाबी फुल....
हाथ लावायला उठताच
त्याने दिली मला झूल...
कृष्णा

जांभूळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजतो....
इथे तर आई भवानीचा
उदो उदोकार गाजतो....
कृष्णा

सखे तू नाहीस ग भांडत
तुझे शब्दच भांडतात
एक एक समोर येवून
चारोळीतून गार्हाण मांडतात
कृष्णा

सखे करतोय मला बेधुंध
हा रातराणीचा सुगन्ध
फेर धरतात चंद्र चांदणी
नभ उतरून आले अंगणी
कृष्णा

रेश्मा च्या चारोळ्या...

तू आणि मी
मी आणि तू
आता काही वेगळे नाही
एकाच धाग्याने गुंफल्यावर
रेशु

तुला भेटणार आहे
तुझे दुख ऐकणार आहे
इतकं विशाल हृदय आहे माझ
समुद्र सुद्धा त्यावेळी गोठणार आहे
रेशु

मलाही आता एकदातरी
तुला पुन्हा भेटायच आहे
माझ चुकलेल गणित नव्यानं
तुझ्यासामार मांडायचं आहे
रेशु

तू फक्त साथ दे
असा तू म्हणत होतास
पण मी सोबत असताना
तू कुठ गडप होतास
रेशु

Tuesday, October 4, 2011

सोंगाड्या च्या चारोळ्या

वास्तवात नाही जमले तरी,
स्वप्नांत खरे प्रेम मिळवता येते ...
वास्तवात नसले तरी,
स्वप्नांत मात्र "मृगजळ" गाठता येते ..!
- सोंगाड्या ..

वास्तवात नसलो तरी ,
माझ्या 'स्वप्नांच्या नगरीचा' मीच 'राजा' आहे ...
वास्तवात नसली तरी,
'स्वप्नांच्या नगरीत' जगण्याची काही औरच 'मजा' आहे ...!
- सोंगाड्या ...

Monday, October 3, 2011

रणजीत च्या चारोळ्या भाग २

फसवत नाहीत नाती
फसत असतो आपण
सवयच ती कोणालाही जवळ करण्याची
मग दूर गेल्यावर दुख:त जाण्याची...
रणजीत.......०३/०२/११३.३६am

मनातला घाव मनातच
ठेवू जपून किती
अर्थच नाही प्रेमाला जिथं
ते प्रेम कुठवर तसेच नेवू.......
रणजीत.....०३/०२/११.3am

दुन्येच्या गर्दीत एकटा मी
दुख:त सावरतो स्वत:ला स्वत: मी
फुलायचे भान न्हवतेच मुळी मला
म्हणूनच काट्यांच्या मर्जीत एकटा मी
रणजीत ०३/०२/११ २.४६am

शुभ प्रभात............
पाखरे उठली
नव्या दिशेने चालण्यास
नवे लक्ष्य गाठण्यास
हसत मुख बागडण्यास.........
आपण हि अशीच सुरवात करू........
चला उठारे सकाळ झाली..........
रणजीत..........०४.०४am

जगावे किती कोणासाठी
पळावे किती मृगजळापाठी
हे चक्र चालावे तरी किती
जगण्यासाठी प्रश्न आहेत तरी किती
पण उत्तर फक्त एकच माझ्या शरीराचा अंतच..........
रणजीत....... १६/०९/११

जगतो तर असा रोजच
हसतो हि असा रोजच
लढेन हि शेवटपर्यंत
दोष मी कोणाला का देवू
मग कोणी भेटो वा न भेटो
जगणे मी का सोडू....
रणजीत....०३/०२/११/३.२४am

दुखाचा डोंगरच इतका
कि सुख काय दिसत नाही
तरही हसतो अन हसवतो आहे
जगण्या-मरण्याची तमा आज हि नाही......
रणजीत...०३/०२/११ ३.२६.am

अस फक्त तुलाच का वाटत
माझा काय फायदा
म्हणून तुझे (तिचे) सुख मागतो
तू (ती) नाही म्हणून कि काय
चालताना कधी कधी रस्त्यावर एकटाच थांबतो...
रणजीत.......०३/०२/११/३.१६.am