Sunday, October 9, 2011

मजेदार चारोळ्या: चारोळीला चारोळीने उत्तर..

तू जाऊच शकत नाही
माझ्यापासून दूर
शब्न्दात माझ्या असा गुरफात्लास कि
आता तुला ते सोपं नाही ..सोपं नाही ..सोपं नाही ..
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.१५

जावे तर सगळ्यांनाच लागे
हा तर खेळ नियतीचा
क्षणिकच तू अन मी
यात गुरफटणार तरी मी कसा
रणजीत...रात्री ०३.०६)०९/१०/११

नात तुझं माझं,
एका क्षणभराचा !
अन त्याच क्षणात
लाख जन्म जगणाऱ्या अमृती जीवनाचं !!
रेशु ०९/१०/२०११ रात्री 3.३२

नात तर सांगते
अन दुसर्याच क्षणाला
मला हरवण्याचा गोष्टी तुझ्या
अमृत ते हि विषासमान वाटे ....
रणजीत...रात्री ०३.३६)०९/१०/११

तुला विष वाटो व अमृत
मला जिंकण्याचं वेध लागलाय आता
जसा मेलेल्या
आत्म्याला जगण्याचा आकर्षणाचा !!
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.४८

हडळीसारखे वागणे तुझे
जिंकण्यासाठी आंधळीच झालीस तू
हे ना कळे तुला जिंकली जरी तू
हरण्याचे दुख: ना आजतागायत मला
तुझ्या चेहऱ्यावरच्या हास्यात आनद तो मजला....
रणजीत...रात्री ३.५६)०९/१०/११

या मांडलेल्या खेळाच्या बाजारात
तू बोलतोस तुझी जीत आहे
खर तर तू तुझ्या मनाला विचार
जिंकून काहीतरी नक्की हरलायस तू
रेशु ०९/१०/२०११ रात्री ४.०५

आज थांबलो आहे जिंकून हरण्यासाठी
पुन्हा नाही थांबणार शब्दांचा खेळमांडण्यासाठी
अस्तित्वासाठीच जगडतो आहे आजही
म्हणून तर मृगजळसारखे जगणे मला नाही जमणार.....
रणजीत...पहाटे ०४.२१)०९/१०/११

तुझ्यात स्वत:ला,
बघत होते मी.
तुझ्यात मन माझे,
शोधत होते मी.
आता तुझ्या जिंकण्यात
स्वताला हि हरवले मी
रेषु ०९/१०/२०११ रात्री ४.२५

असे माझ्यात तुझे
बघणे ते कसे म्हण्याचे
अंता पर्यंत वाट पाहायाची
अन शेवटी तूच हरलास
असे दाखवून जयायचे....
रणजीत...पहाटे ०४.३०)०९/१०/११

दिलेली भेट प्रेमाची असते, तागडीत तिला तोलू नये
खोक्यावारल्या खोडलेल्या किमतीचा अंदाज कधी करू नये
जेव्हा जगन हा एक भार असतो तेव्हा शब्दांचाच आधार असतो
म्हणून तू आणि मी जिंकलो आहोत का हरलो ते कृपया सिद्ध करू नये
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.३७

थांब थोड बोलायचे आहे
असे म्हणून कोणी आईकून
घेत नसे कोणाचे
जीवनात हार जीत महत्वाचे नाही रे
हसत जगत असताना चार शब्द प्रेमाने बोला रे
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ४.४०)

मुलगा चार शब्दांच आयुष कधीच नसत
सा-या शब्दात आयुष्य घुत्मल्त
हवी असते एखादी गोष्ट जेव्हा
आयुष्यच आपल्याशी दगा करत
लक्ष्मीकांत

अरे मना.. तू अजुन बेचेंन का?..
प्रेमाच्या जखमा अजुन भरल्या नाहीत..
तरी त्याची ओढ का????
काटेरी एकाकी रस्त्यावरून चालताना...
फुलांच्या पायघद्यांची स्वप्न का??????
आयुष्याची मिळालेली वाट एकटीने,
चालायची अस समजून सुद्धा...
कोणाचा सोबतीची आस का????? -
आयुष्यात हरलेय पूर्णपणे,
तरी जिंकायची आस का ???????????
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.४९

मी नाही हरलो
नाही माझे प्रयत्न हरणार
माझ्या बरोबर
तुम्हाला हि जिंकावेच लागणार
रणजीत.....१५/०८/११/ (रात्री १२.१०)

हरू नकोस इतक्यात
जगण आयुष्या पेक्षा मोठ आहे
थांबू नकोस आता
खड्ड्यांची हि सुरुवात आहे
लक्ष्मीकांत

भूतकाळात कासवाला कमी लेखले
आळसाने सस्याला हरवले..
पण,आज कासव जिंकले नाही
कारण,ससा वाटेत ’झोपला’ नाही..
अरे,ससा आता कधीच हरणार नाही
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.५५

भूतकाळातील चुका तू सुधरशील
हे खरे जरी एकदा तू हरले
पुन्हा हट्ट करू नको जिंकण्याचा
काय सांगावे कासवामुळेच हे धाडस तुला आले...
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.००)

हुश्शश्श्श्स, झाले शांत सगळे
गेले सारे रातकिडे
जगणे संपल्यावर कळले
मृगजळा मागे धावणे व्यर्थ आहे
लक्ष्मीकांत

ना जिंकण्यासाठी ना हरण्यासाठी
शब्द देऊनच शब्द घेतो आहे
शब्दच्या देवाण घेवानेच तरलो आहे
घड्याळाकडे लक्ष ना कोणाचे
तू मी शब्दांचा खेळ खेळतो आहे
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.०६)

धाडस मला भूतकाळातील चुकानेच आले
पण जिंकण्यासाठी cheating नाही केली खेळात
आजही परत मी जिंकता जिंकता हरले
कशी नशीबाने परत थट्टा माझी मांडली या काळात
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.१४

तुझ्या धाडसाला सलाम माझा
पण अनाधिकृतपणे खेळ ना खेळलो मी कधी
तू तर हरवण्यासाठी खेळतेस आणि मी जिंकवन्यासाठीच
म्हणून तर तुझी थट्टा तूच करतेस.......
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.२२)

हातात हात देती, तू चालशी पुढे अन्
अर्ध्यावरुन मागे वळतात लोक येथे
सोडून एक‌‍ट्याला पळतात लोक येथे
दुसर्यांना हरवण्यासाठी डाव मांडतात लोक येथे
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.३३

हात आपण सोडतो, नावे लोकांना ठेवतो
डाव हरण्या जिंकण्यासाठी कधीच नसतो
तुलना करून आपणच त्यामागच समाधान जाळतो
लक्ष्मीकांत

हात देऊन मागे खेचणे ना जमले मला
आता पर्यंत मदतीचा हात देतो आहे लोकांना
तेच लोक हरण्या जिंकण्याची भाषा करतात
चार चोघात मलाच परके करून
स्वतःच माझ्या पाठीत खंजर खुपसतात..
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.३६)

आपल्यासाठी परके कोणीच नसते
आपणच आपल्यासाठी परके बनतो
चार चौघांच्या प्रतिष्ठे पायी
आपणच आपलेपण गमावतो.
लक्ष्मीकांत

आता सगळं संपलय,
उठलाय खेळाचा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
आता माळ आसवांची
पाहतेय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार
नाही कुणाच्या - साथीची
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.५०

वाट पहाणे हेच तर जीवन आहे
साथ घेण्यापेक्षा देण्याला महत्व आहे
झाल असत जर सगळ वेळे आधी
म्हटल असत मग आता जगण्यात काय मजा आहे .
लक्ष्मीकांत

आता खर असं वाटतेय कि
मी जिंकुनही हरले तू हरुनही जिंकला
मला खुप गर्व होता माझ्या शब्दांवर
आता तेच शब्द फ़क्त हसुन पाहत आहेत माझ्यावर
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.००

खूप खेळ खेळलो चारोळ्यांचा
वाटे कधी ना थांबो हा खेळ चारोळ्यांचा
पण तू अशी साथ ना कधी देणार
ना मला हौस जिंकण्याची
मला तर हौस दुसर्यांना सुखी पाहण्याची
म्हणूनच तुला जिंकवण्या करीता
केलेल्या चारोळ्या पुन्हा खोडतो मी....
तुझ्याच चारोळ्या जास्त तुलाच दर्शवतो मी....
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.५६)

शब्द आहेत ते
कधी न रुसणार कुणावर
मायेने गोंजारा त्यांना
नेतील ते एका सुंदर वळणावर
लक्ष्मीकांत

शब्दही उरले नाहीत आज सांत्वनाला !
अर्थ कधीच नव्हता त्या माझ्या शब्दांना !
एकदाच ये एकदाच माझ्यासाठी ,
यायचे न मी तुला पुन्हा कधी विनवायला !!!!!! !
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.१२

इतक्यात तू कशी हरली
बाजार तो कसला
मानतेस हा तर खेळ शब्दांचा
दुख: सोबत एकटेपणा आले तुझ्या वाट्याला
आम्ही असता तुझ्या सोबतीला
हसतात हसतच आले असतील ती आसवे
उगाच त्यांना दुखाचे नाव नको देऊ
आस ती डोळ्यात असवी नव्याची
पण साथ तुझी मी अजून सोडली नाही
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ६.१४)

हे ते पहा सूर्य उगवतो आहे
कदाचित त्याला हि घाई झाली असावी
शब्दांचा खेळ हा पाहणायची
आम्ही थकलो नसून
जागेच आहोत तुझ्यासाठी
हे सांगायचे आहे मला हि
०९/१०/११. (पहाटे ६.२६)

अखेर तू मला सोडून गेलास ,
भन्नाट वादळी वा-याप्रमाणे.
मी तुझ्या प्रेमात वेडी झाले ,
पण ते प्रेम तु पायदळी तुडवून गेलास ,
दिलास नकार मजला आणी,
परका करून गेलास .
जिंकून सवॅकाही
इथेच मला कायमचा हरवून गेलास
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.३०

हि घाई तर तुलाच
मला सोडून जाण्याची
वादळा समोर नतमस्तक होण्याची
आले प्रसंगात साथ न देताच
मला खोटे ठरवण्याची
जिंकणार तरी तू कशी
तुही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी....
०९/१०/११. (पहाटे ६.३६)


तू जिंकण्यासाठी स्वतःला हरवत गेले मी ..
स्वतःचे अश्रू विसरून तुला हसवत गेले मी ...
वाटलं होता थांबवशील मजला ..
नकळत स्वतःला एकट टाकून गेले मी ..
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ०६.४३


मी ना आस धरली जिंकण्याची
पण एक बरे तू हसण्यास लागली
आता हरून देखील जिंकलीस
मग तू एकटी कशी म्ह्नायायची.......
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ६.४६)

0 comments:

Post a Comment