Showing posts with label रणजीत. Show all posts
Showing posts with label रणजीत. Show all posts

Tuesday, January 3, 2012

रणजीत च्या चारोळ्या-मेहफ़िल

का कोणास ठाऊक
पुन्हा पुन्हा यावेसे
वाटते तुझे मदमोहक
नृत्य पाहण्या मन माझे
तुझ कडे वळते...
रणजीत

मी हि झुंबर होतो
अशाच रंग महाली
जिथे उधळत असते
अखंड योवन लाली
रणजीत

तू केसात माळतेस गजरा
नृत्या बरोबर गातेस हि
करुनी हसतमुख चेहरा
म्हणूनच का लोक म्हणती याला मुजरा
रणजीत

तू सुंदर लावण्यवती मेनका
करशी अनोखी अदा
मग मीही रंगेल होऊन
उधळतो दोलतजादा
होऊन फकीर तिथला
रणजीत

कित्येक मर्द येती
तुझ्या दारा
आयकुनी नृत्य,गाणी
ठेऊन जातो भाव वेगळा
रणजीत

तू नृत्य करता करता
गायशी गाणी
मदहोश करते त्याहुनी
तुझी नजर बोली
रणजीत

संपत चालला योवन रंग
सुरकुतलेले केतकी अंग
म्हणून कोरड्या दुष्कागत गर्दी
कधी तरी होते आता सुरांची दर्दी
रणजीत

उदास तू बसली
मोकळ्या महाली
काळ तो आठवता
स्वतः हसली स्वतः वरती
रणजीत

मी याच आशेने इथे बसलेला
सजेल बैठक गर्जतील वादये
जुळेल ते नाते हाताचे गजर्याशी
तू पुन्हा तीर्क्शील या रंग महाली
रणजीत

मला वाटले नव्हते
माझी आस हि
मृगजळ होऊन बसेल
तुझी साथ आता मला
कधीच नसेल
रणजीत

तुला पाहताच नाव
माझे हरवले होते
तुझ्याच ओठा वरती
मग आले होते
रणजीत

तुज्याच पायाखाली
पैंजण बनून
हरवलो होतो
नृत्य संपताच
स्वतःला सापडलो
रणजीत

सांग ना पुन्हा कधी
मला साद देशील
तुज्या हाकेसाठी
माझे कान हि तरसतील
रणजीत

का हि वेळ आली
अन तू मला
रंग महालातून
जाण्यासाठी शुभ रात्री म्हंटली...
रणजीत

अशी काय जादू
तुझ्या मैफिली
मी न राहतो
माझ्या मनी...
रणजीत

अग थोड बोलाचे
तरी होतेस मी
तर महाल बांधला
होता तुझा नावचा
त्यात तू होती नर्तिका...
रणजीत

तुझ्या त्या आदाने
मी तर झालो होतो फिदा
न राहून लोक हि बोलले
झाला हा हि वेडा..
रणजीत

तुझ्या मैफिलीत
येती लोक खूप
मी हि कोपरा
पकडून बसतो चूप
रणजीत

आजही मी रंग महाली
जाऊन येतो जरी
तू नसली तरी तुझ्या
आठवणी ताज्या करतो
रणजीत

तू तर नटरंग
नारी भलतीच
भुरळ पाडी तुझी
नृत्य,गाणी...
रणजीत

Saturday, October 15, 2011

छायाचित्र चारोळ्या: चिमणी अन तिचे पिल्लू


चिमणे झुंज तुझी माझी
अशीच चालू राहणार
तू उडून गेल्यावर मग हा
चिमणा कोणाशी भांडणार?
कृष्णा

किती जतन केले आहे......
तुझे माझे नाते जपायला.......
तुझा माझा सहवास हवा....
आपले घरटे रचायला.....
हि मजा काय वेगळीच आहे....
तुझ्या चोचीतून दाणे टिपायला.....
सुप्रिया.

तुझ्या माझ्या नात्यात
एक मजाच आहे निराळी
एक घास तू आणावा
अन मी तो अलगद टिपावा
कृष्णा

असंच राहू दे नाते अपुले...
त्या नात्यात सदैव प्रेम वसुदे.....
येवोत मग हजारो वादळे.....
त्या वादळात फक्त साथ तुझी असूदे......
सुप्रिया.

जात आहे दुर तुला सोडुन
विसरू नकोस मला
मी आहे तुझा,परत
एक दा मागे वळुन पाहतो
तुला मी च तुझा मीच तुझा.
*विपुल*

प्रेमानेच विणलंय नात आपलं
त्याला आहे दोघांनीही जपलं
किती आली अन गेली वादळ
तरी प्रेमानच त्याला आहे पेललं
कृष्णा

आईचे पिल्लाशी असेच असते अवीट नाते ..
वणवण फिरून पिल्लासाठी आणते शिते ..
स्वत: उपाशी राहते आणि पिल्लाला भरवते ..
वर्षानुवर्षे आपल्या आईनेही हेच केलेले असते ..
मंजुषा

घास आणते पिलांसाठी ...
अशी कशी वेडी हि आई ...
चोची मध्ये सामावलेले...
जगातील सुख दिसून येई..
@*मंथन*'

किती दुरून तिने पिलासाठी
एक घास आहे आणला
भरवता भरवता तिचा
जीव आहे टांगणीला लागला
कृष्णा

चोचीमध्ये घास बाळा...
आहे तुझ्यासाठी....
फिरून आली रानोमाळ बाळा...
वेडी हि माय तुझ्यासाठी...
@*मंथन*'

जड अंतःकरणाने आई ..
आज तुझा निरोप घेतो ..
माझ्यासाठी तू पाहिलेली स्वप्ने ..
पुरी करूनच येतो ..
मंजुषा

तुझ्यासाठीच आणलाय
घास फिरून रानोमाळ
बघ किती लोटला हा काळ
आता लवकर मोठा हो बाळ
कृष्णा

देणारे देत जातील
खाणारे खूप खातील
असेच घास भरवले
आम्ही राजकारण्यांना
काही काळ सरल्यानंतर
लाथ मारतात जनतेला
हे पाखरू हि असेच करेल
एक दिवस आईला सोडून पळेल.......
रणजीत....दुपारी २.३६ १५/१०/११

सदैव धडपडते पिल्लांसाठी हि आई....
उन-पाऊस-वारा ह्याची तिला तमा नाही....
अजाण असतात ती पिल्ले सारी.....
पंख फुटता भुर्रकन उडून जाई.......
सुप्रिया.

एक-एक धागा शोधून घरटे त्यांनी रचले.....
मायेच्या प्रेमाने होते हो विणले.....
उन-पाऊस-वारयातही त्यांनी ते जपले....
त्या पक्षांचे घरटे हळूच हो मी टिपले....
सुप्रिया.

पिल्लांसाठी सहन करते उन-पाऊस-वारा...
धडपडून आणते त्यांच्यासाठी चारा...
करीत नाही कधी अपेक्षा फार....
मोठा झाल्यावर हा ना करेल थारा....
कृष्णा.

Tuesday, October 11, 2011

मजेदार चारोळ्या: चारोळीला चारोळीने उत्तर - भाग २

असतात काही झुडपे
चार महिन्याच्या पावसात जगणारी
असतात काही माणसे माझ्यासारखी
आयुष्यभर नुसत्या आठवणीत जगणारी
रेशु ०९/१०/२०११ रात्री १०.३०

    
नुसत्या आठवणीत जगून
काही मिळत नाही
जीवनात ठेवले आहे काय
एका प्रेमाशिवाय....

तुझ्यासाठी आठवणी तरी आहे
माझ आयुषच जणू एक मृगजळ आहे
भास आहे केवळ तेथे कोणीतरी असण्याचा
कंटाळा आलाय आता सारखा भासात फसण्याचा
लक्ष्मीकांत

सोडा मृगजळाच्या मागे धावणे
स्वतःतला कस्तुरीमृग शोधा
जीवन हे क्षणभंगुर नुसते
भंगाशिवाय मिळणार काय दुसरे..
*प्रेम*

मला मृगजळाच्या मागे नाही
सोबत धावायचं आहे
भंगलेलं ते स्वप्नं
परत एकदा जोडायचं आहे
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.०४

जोडणारे स्वप्न पाहत
आयुष्य निघून जातं
मृगजळ शेवटी मृगजळच राहत
नसते कोणाचे ...कोणाशिवाय ..
*प्रेम*

मान्य आहे मला
मृगजळ मागे धावणं योग्य नाही
पण डोळ्यात माझ्या सामावलेलं
स्वप्नही एवढा छोटं नाही .......
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.१५

डोळ्यांची स्वप्न आजकाल
चष्म्यासारखी बदलतात
आज एकासोबत तर
उद्या दुसर्यासोबत फिरतात..
*प्रेम*

स्वप्न असुदे डोळ्यात तुझ्या
पूर्ण करण्याचा हट्ट नको
प्रयत्न असू दे तसा
पण स्वप्नात जगण्याची सवय नको
लक्ष्मीकांत

हसू नका असे ,सत्य आहे
सत्याचा सामना करा
खरे प्रेम शोधा स्वतात
मग पारखून प्रेमाचा स्वीकार करा ..
*प्रेम*

सत्य हे कटू असते...
त्याला हसुन करू गोड...
सत्यातली सत्यता घे जाणून...
कधी कधी त्यालाही असत्याची जोड..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.२७

प्रेम आणि असत्य
कधीच सोबत असू शकत नाही
मग शेवट काय होणार त्याचा
अगदी ठरलेला...
*प्रेम*

हा हा हल्ली असत्यालाच
१००% सत्य दर्शवतात
प्रेमाचे काय घेवून बसलात
गल्ली बोळात प्रेमाचे खोटे चाळे चालतात
रणजीत..११.३६रात्री ०९/१०/११/

वेड्या असत्य आणि प्रेम यांच
अतूट अस नात
असत्याचा हात धरला तरच
आजच प्रेम टिकत
लक्ष्मीकांत

प्रेम आणि चाळे म्हणजे
मन आणि वासना
कोणी काय करायचे
ज्याचे त्याने ठरवावे....
*प्रेम*

सगळे असाच विचार का करता तुम्ही ???
कुणाचाच का प्रेमावर विश्वास नाही राहिला
खरा प्रेम करून तर बघा आधी
तुमच्या सत्य असत्यात प्रेमाचा पण जीव घुसमटला
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.४०

प्रेम म्हणजे आजकाल
फळाप्रमाणे झाले आहे...
ऋतूप्रमाणे ते पण
नेहमी बदलत जाते ..
*प्रेम*

आजची परिस्थितीच अशी
खरे खोटे काय समजत नाही
जिकडे तिकडे अनैतिक चाळे सगळे
खरे प्रेम मिळणार तरी कोठे....
रणजीत..११.४३रात्री ०९/१०/११

आजकाल तर असत्य असलेलेच
प्रेम टिकू शकते
कारण खऱ्या प्रेमाची
कोणालाही जाण नसते !!!!
*आशीष*

प्रेम...? आईने केलेले ते..?
की बाबांच्या धाकामागे लपलेले...
प्रेयशी ने केलेले प्रियकरावर...
पण ते ही समाजाच्या जाळ्यात गुरफटलेले..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.४७

प्रेम, प्रेम आज उरलाय कुठे??
प्रेमाचा आणि त्यागाचा संबंध आता राहायलाय कुठे?
उठतोय सुटतोय तो प्रेम करतोय
घरचे नाही म्हटले तर प्रेमाला सोडून देतोय..
लक्ष्मीकांत

असेल खरे प्रेम तर
समाजाशीपण लढता येते.
पण समाजाच्या नावाखाली
प्रेमाचा बाजार सगळा.
वापरले अने फेकून दिले..
*प्रेम*

प्रेम म्हणजे प्रेम असत
सत्य असत्या असं त्यात काहीच नसतं
त्या अनैतिक चाल्यांमध्ये सुद्धा
त्या दोघांच एकमेकांवर प्रेम असत
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.५०

नुसता बाजारूपणा
प्रेमाच्या नावाखाली
स्वतःतर बरबाद
पण दुसर्याला हि कलंकित करे
रणजीत..११.५३रात्री ०९/१०/११/

प्रेम म्हणून चाळ्यांना
प्रेमाचे नाव नको देऊस
असत्यावर आधारलेले
प्रेम ते कसले...
*प्रेम*

खरे प्रेम तेच जे...
मनात वसलेले असते...
नियमांना तोडून जे...
निरंतर टीकून राहते..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.५६

आजकाल प्रेमाची संकल्पनाच बदललीये
भावनांची जागा आज चाळ्यांनी घेतलीये
विश्वास होता एके काळी
आता लाजेचीही झालीये होळी.
लक्ष्मीकांत

तुझं माझं प्रेम...
आपल्या मैत्रीतच वसलेलं...
तु हाक मारलीस अन...
मी अचुक ऎकलेलं
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.५९

हाक नव्हती ती तुझ्यासाठी..
तो एक तुझा भास होता...
हवेतून आला कानापार्येंत
आणि विरून गेला....PP
*प्रेम*

तुला भारीच सवय...
मना मध्ये बोलायची..
मी समोर असलो..
माझी पण व्हायची गोची..
©*मंथन*™.. १०/१०/२०११ रात्रौ १२.०५

जाते आहेस तर जा
पुन्हा या प्रेमाच्या बाजारात नको येउस
अशाने आयुष नाही घडायचे
यात च मी माझे अमुल्य क्षण गमावले
*** आशिष ***
मनाची भाषा कळायला पण
मन असावं लागतं
मोकळ्या मनानं बोललीस
तर कळले असते मला..PP
*प्रेम*

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.०५

अर्थ मनात असतो
नाही शोधलास कधी तू
नाही बोललीस तरी
डोळ्यांची भाषा कळते मला...PP
*प्रेम*

न बोलण्याने गुंता कधी सुटत नाही
भावना व्यक्त होण्याच्या थांबत नाही
शब्दांची साथ नसेल कदाचित
संवेदना खुलल्याविना राहत नाही
लक्ष्मीकांत

तुझ्या येण्याची चाहूल...
देऊन जातो हा वारा वाहणारा...
अन तुला भेटायचे म्हणून...
तो उडालेला माझा गोंधळ सारा...
©*मंथन*™.. १०/१०/२०११ रात्रौ १२.१३

गोंधळ तुझा उडाला
तिला ते सवयीचे होते
फुलपाखरुच होते ते
उडाले या डालीवरून
दुसर्या डालीवर....PP
*प्रेम*

 तुझ्या सोबतच्या पाऊलखुणा
शोधतच राहीन मी
अजूनही आस आहे तुझ्या पावलांच्या परतीच्या वाटेवर
माझ्या किनार्यावर परतणाऱ्या प्रत्येक लाटेवर
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.२०

लाटा येतात लाटा जातात
लहान आणि मोठ्या पण
प्रत्येक वेळी नवनवीन
रुतलेल्या खुणा तुझ्या
वाहून गेल्या लाटेसंगे ..PP
*प्रेम*

येईन पुन्हा मी तुझ्या किनार्यावर
पण हवी आहेस मला तू, पुन्हा त्याच वळणावर
भेटलो होतो त्यावेळी आपण तसे
हातात हात नसूनही एकरूप होतो जसे.
लक्ष्मीकांत

मी वाहवत गेलो खूप दूर
तुझ्यामुळे
तू राहिलास किनार्यावर
तर मी दुसर्या किनार्यावर...
न भेटणाऱ्या ....
*प्रेम*

किनार्याच्या लाटा काय रे
येतात आणि जातात तरी
माझ्या मनातून तू जात नाहीस
शब्दातून तू जरी गेलास तरी
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.३०

मन असते काय ग
कोणावरही जडतं
शब्द सुटतात तीरासारखे
घुसतात काळजात अगदी
खोलवर....कधीही न संपणारे ..
*प्रेम*

जेव्हा मी वही पेन घेऊन बसते
तेव्हा मला शब्दच नाही सुचतात
पण रोज रात्री तुमच्या सोबत या मैफिलीत
चारोळ्यांचा थरवर थर रचतात
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.४१

वही आणि पेनाचेपण बघ ना
असेच असते एक भरत जाते
तर दुसरे संपत जाते....
बस थर निर्माण होतात आठवणींची तुझ्या......
*प्रेम*

शब्दांच्या साठी साठी वही पेनची गरज काय
शब्दांचे आकाश आहे खुले
शब्दांचे सारे तारे येथे
भावनांच्या साथीने होतील त्यांची फुले
लक्ष्मीकांत

खुल्या आकाशातच प्रेम
तुझे खुललेले
आज कळी उद्या फुल झालेले
अन तुटून मुर्झुन गेलेले...प्रेमाशिवाय....
*प्रेम*

सवयच विकृताना जे चांगले चालले ते
उध्वस्त करण्यासाठीच आयुष घालवले त्यांनी
दुसर्यावर टीका करण्यात चांगले काय जमले नाही
म्हणून असे उदोग चालवले
*रणजीत*

या सगळ्या भाऊगर्दीत
माझं प्रेम हरवून गेलं
सांगायचं होतं तिला काही तरी
सांगायचं राहून गेलं ..
*प्रेम*

Sunday, October 9, 2011

छायाचित्र चारोळ्या: सुर्यास्त, समुद्र किनारा अन दोघी आपण..

हे बघ तुझ्या माझ्या
मैत्रीची साक्ष देत आहे
मावळता सूर्य उफळनाऱ्या लाटा
मोन पाळत असल्या तरी
भेटण्याची आस दाखवत आहे....
रणजीत...रात्री१.००)०९/१०/११

असेच राहतील का गं..
हे दिवस सुगीचे...
संध्याकाळ चा हा किनारा
अन क्षण हे सोबतीचे...
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.०८

तो बघ सुर्य....
जो चाललाय मावळतीच्या दिशेने...
तुझी माझी मैत्री आहे...
त्याच्या प्रत्येक किरणाच्या आशेने..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.१४

एक एक लाट
किनार्‍याला येऊन भिडते आहे
किनार्‍यावर बसलेल्या जोडप्यांना घेऊन
साय़ंकाळ त्यांच्या प्रेमासहित बूडते आहे
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.१९

सागरच्या लाटा कश्या...
आपल्या पावलांना स्पर्शुन जातात...
जाता जाता त्या आपल्याला...
जिवनाचे गुणधर्म सांगुन जातात..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.२१

भरति आलि कि सागराचे पाणि
हळू हळू वाढते
वाळूवरति लिहिलेल्या तुझ्या नावाला
ति सहजा सहजि खोडते
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.२२

बालपणीची हि दोस्ती...
अशीच फ़ुलत राहू दे....
संध्याकाळच्या सुर्यास्ता सोबत...
रोज बहरत राहू दे...
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.२८

तुझ्या माझ्याया मैत्रीत
मी तू हि अशीच
हरवून जाऊ
त्या करीता या
सूर्य सागराला साक्षीला ठेवू...
रणजीत...रात्री१.३६)०९/१०/११

सुर्याला बघ कसे...
सागराने टाकले गिलून...
तेव्हाच वाटतय सागराला...
आलयं पोटात मळमळून..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.४८

निळा खवळलेला समूद्र...
अन सोबत दोघी आपण...
सुर्यास्ताला निघालेला सुर्य...
या क्षणाच्या साक्षीदार दोघी आपण..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.५७

हा तर खेळ रोजचाच
चाले या दुविधा रोजच्याच
निरोप तुला देण्या आला सूर्य
दुख: ते ना सोसले त्या सागरला
त्याने हि हंबरडा फोडला.........
रणजीत.....०८/१०/११. (रात्री ०२.०६)

छायाचित्र चारोळ्या: खेळ बालपणीचा..

बालपणी खेळ तो...
खेळ भातूकली चा....
खेळता खेळता सरून जाई...
काळ तो बालपणी चा..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.३५

मी मोठा झालो की..
तुला ठेवेन खूप सुखात....
तूझ्या साठीच बांधेन माडी...
या मावळत्या सुर्याच्या प्रकाशात..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.४२

स्वप्नांच्या वाटेवर
शीतल गारवा
दोघे गुंफुनी हात
गाऊ मधुर मारवा
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.४३

आपल्या छोट्याश्या घराला...
सुर्याची असेल खिडकी...
दिवसातुन एकद तरी...
मारेल तो इकडे फ़िरकी..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.४६

या कातर सायंकाली
मन हेलावून जाते
थरथरत्या स्पर्शाने
तन रोमांचित होते !
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.४6

हा खेळच भुरळ
पाडे प्रत्येकाला
स्वप्ने दाखवी प्रत्येक क्षणाला
चल पुन्हा तयारी करू
स्वप्न पाहण्याला.......
रणजीत.....०८/१०/११. (रात्री १.४६)

मनाची तनाला
नेहमीच असते साथ
सांग नाही सोडणार
हाती घेतलेला हात !
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.५१

तुझी माझी साथ
अशीच राहू दे
हा तर खेळ झाला
पण आयुष्यभर असाच
हात हातात राहू दे......
रणजीत.....०८/१०/११. (रात्री १.५६)

आज या खेळात .
मला हि पहायचे आहे
कोण कसे बांधता आहेत माडी
नसेल येत तर बांधता तरी
पाहायचे आहे कोण कशी घरची वाट धरी
रणजीत.....०८/१०/११. (रात्री ०२.०६)

त्या क्षितीजाच्या अलीकडे,
तू कुठेतरी असशील !
मला दिसत नसलास तरी,
तू मात्र माझाच राहशील !!
रेशु ०९/१०/२०११ रात्री २.२०

मी तुझा तो कसा होणार
क्षितीज माझे हे
तुला कसे सापडणार
कारण मी माझाच जगणार.....
रणजीत...रात्री २.२६)०९/१०/११

कुठॆतरी ह्र्दयात इतिहास सारा आठवशील
तो आठवण्यापुरता तरी तु…
नक्कीच माझा राहशील
पण तुझी शपथ पुन्हा प्रेम करणार नाही….
रेशु ०९/१०/२०११ रात्री २.२७

तुझा इतिहास तो आज
वर्तमान आहे माझा
शपथा त्या का घ्यायच्या
असे प्रेम ना पचेल तुला....
रणजीत...रात्री २.४०)०९/१०/११

शपथ जरी घेतली
तरी ओढ संपणार नाही
आता बस कर हा शब्दांचा तमाशा
नाहीतर माझे अश्रू थांबणार नाही
रेशु ०९/१०/२०११ रात्री २.४९

दुख: किती ते तुझ्या मना
मला हि पाहायचे
ओढ ती अशी कशी
शपथ तर तू घे पण शब्द ना
मांडलेस तर मरण ते मजला यायचे...
रणजीत...रात्री २.५३)०९/१०/११

शपथा जरी खोट्या झाल्या
तरी मरण येणार नाही
केलेल्या पापाची शिक्षा दिल्याशिवाय
वरती देवही घेणार नाही
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.००

पापी मी का तू
हे न उमजेल देवाला
हा तर शब्द खेळ
यात हि तू स्वर्गा नरका सकट
देवाला हि आणले भागीदारीला
रणजीत...रात्री ०३.०३.)०९/१०/११

शब्द नाही आहेत हे सगळे
पाप पुण्याचा होऊ दे सरळ सामना
देव देव्हाऱ्यात राहतो
दुनियेची त्यास काय कल्पना
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.१५

तुझे हे असले शब्दच
जगणार्याला हि कायमचे झोपवतील
एक काय पण सारेच देव
न्याय निवडा करयाला
तुझ्या माझ्या समोर येतील.........
रणजीत...रात्री ०३.२६)०९/१०/११

फक्त शब्दच तर
माझ अस्तित्व आहे
त्यासाठी सगळ्यांचा जीव घेईन मी
मग करू दे देवाला काय तो न्याय निवडा
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.४२

तुझ्या शब्दानेच मारले
माझ्या या भोळ्या हृदयाला
लाखो वार करुनी
आणकीन जीव घेनाची धमकी हि खूप देतेस
देवाला हि वेटीस धरतेस.......
रणजीत...रात्री ०३.४६)०९/१०/११

मजेदार चारोळ्या: चारोळीला चारोळीने उत्तर..

तू जाऊच शकत नाही
माझ्यापासून दूर
शब्न्दात माझ्या असा गुरफात्लास कि
आता तुला ते सोपं नाही ..सोपं नाही ..सोपं नाही ..
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.१५

जावे तर सगळ्यांनाच लागे
हा तर खेळ नियतीचा
क्षणिकच तू अन मी
यात गुरफटणार तरी मी कसा
रणजीत...रात्री ०३.०६)०९/१०/११

नात तुझं माझं,
एका क्षणभराचा !
अन त्याच क्षणात
लाख जन्म जगणाऱ्या अमृती जीवनाचं !!
रेशु ०९/१०/२०११ रात्री 3.३२

नात तर सांगते
अन दुसर्याच क्षणाला
मला हरवण्याचा गोष्टी तुझ्या
अमृत ते हि विषासमान वाटे ....
रणजीत...रात्री ०३.३६)०९/१०/११

तुला विष वाटो व अमृत
मला जिंकण्याचं वेध लागलाय आता
जसा मेलेल्या
आत्म्याला जगण्याचा आकर्षणाचा !!
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.४८

हडळीसारखे वागणे तुझे
जिंकण्यासाठी आंधळीच झालीस तू
हे ना कळे तुला जिंकली जरी तू
हरण्याचे दुख: ना आजतागायत मला
तुझ्या चेहऱ्यावरच्या हास्यात आनद तो मजला....
रणजीत...रात्री ३.५६)०९/१०/११

या मांडलेल्या खेळाच्या बाजारात
तू बोलतोस तुझी जीत आहे
खर तर तू तुझ्या मनाला विचार
जिंकून काहीतरी नक्की हरलायस तू
रेशु ०९/१०/२०११ रात्री ४.०५

आज थांबलो आहे जिंकून हरण्यासाठी
पुन्हा नाही थांबणार शब्दांचा खेळमांडण्यासाठी
अस्तित्वासाठीच जगडतो आहे आजही
म्हणून तर मृगजळसारखे जगणे मला नाही जमणार.....
रणजीत...पहाटे ०४.२१)०९/१०/११

तुझ्यात स्वत:ला,
बघत होते मी.
तुझ्यात मन माझे,
शोधत होते मी.
आता तुझ्या जिंकण्यात
स्वताला हि हरवले मी
रेषु ०९/१०/२०११ रात्री ४.२५

असे माझ्यात तुझे
बघणे ते कसे म्हण्याचे
अंता पर्यंत वाट पाहायाची
अन शेवटी तूच हरलास
असे दाखवून जयायचे....
रणजीत...पहाटे ०४.३०)०९/१०/११

दिलेली भेट प्रेमाची असते, तागडीत तिला तोलू नये
खोक्यावारल्या खोडलेल्या किमतीचा अंदाज कधी करू नये
जेव्हा जगन हा एक भार असतो तेव्हा शब्दांचाच आधार असतो
म्हणून तू आणि मी जिंकलो आहोत का हरलो ते कृपया सिद्ध करू नये
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.३७

थांब थोड बोलायचे आहे
असे म्हणून कोणी आईकून
घेत नसे कोणाचे
जीवनात हार जीत महत्वाचे नाही रे
हसत जगत असताना चार शब्द प्रेमाने बोला रे
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ४.४०)

मुलगा चार शब्दांच आयुष कधीच नसत
सा-या शब्दात आयुष्य घुत्मल्त
हवी असते एखादी गोष्ट जेव्हा
आयुष्यच आपल्याशी दगा करत
लक्ष्मीकांत

अरे मना.. तू अजुन बेचेंन का?..
प्रेमाच्या जखमा अजुन भरल्या नाहीत..
तरी त्याची ओढ का????
काटेरी एकाकी रस्त्यावरून चालताना...
फुलांच्या पायघद्यांची स्वप्न का??????
आयुष्याची मिळालेली वाट एकटीने,
चालायची अस समजून सुद्धा...
कोणाचा सोबतीची आस का????? -
आयुष्यात हरलेय पूर्णपणे,
तरी जिंकायची आस का ???????????
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.४९

मी नाही हरलो
नाही माझे प्रयत्न हरणार
माझ्या बरोबर
तुम्हाला हि जिंकावेच लागणार
रणजीत.....१५/०८/११/ (रात्री १२.१०)

हरू नकोस इतक्यात
जगण आयुष्या पेक्षा मोठ आहे
थांबू नकोस आता
खड्ड्यांची हि सुरुवात आहे
लक्ष्मीकांत

भूतकाळात कासवाला कमी लेखले
आळसाने सस्याला हरवले..
पण,आज कासव जिंकले नाही
कारण,ससा वाटेत ’झोपला’ नाही..
अरे,ससा आता कधीच हरणार नाही
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.५५

भूतकाळातील चुका तू सुधरशील
हे खरे जरी एकदा तू हरले
पुन्हा हट्ट करू नको जिंकण्याचा
काय सांगावे कासवामुळेच हे धाडस तुला आले...
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.००)

हुश्शश्श्श्स, झाले शांत सगळे
गेले सारे रातकिडे
जगणे संपल्यावर कळले
मृगजळा मागे धावणे व्यर्थ आहे
लक्ष्मीकांत

ना जिंकण्यासाठी ना हरण्यासाठी
शब्द देऊनच शब्द घेतो आहे
शब्दच्या देवाण घेवानेच तरलो आहे
घड्याळाकडे लक्ष ना कोणाचे
तू मी शब्दांचा खेळ खेळतो आहे
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.०६)

धाडस मला भूतकाळातील चुकानेच आले
पण जिंकण्यासाठी cheating नाही केली खेळात
आजही परत मी जिंकता जिंकता हरले
कशी नशीबाने परत थट्टा माझी मांडली या काळात
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.१४

तुझ्या धाडसाला सलाम माझा
पण अनाधिकृतपणे खेळ ना खेळलो मी कधी
तू तर हरवण्यासाठी खेळतेस आणि मी जिंकवन्यासाठीच
म्हणून तर तुझी थट्टा तूच करतेस.......
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.२२)

हातात हात देती, तू चालशी पुढे अन्
अर्ध्यावरुन मागे वळतात लोक येथे
सोडून एक‌‍ट्याला पळतात लोक येथे
दुसर्यांना हरवण्यासाठी डाव मांडतात लोक येथे
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.३३

हात आपण सोडतो, नावे लोकांना ठेवतो
डाव हरण्या जिंकण्यासाठी कधीच नसतो
तुलना करून आपणच त्यामागच समाधान जाळतो
लक्ष्मीकांत

हात देऊन मागे खेचणे ना जमले मला
आता पर्यंत मदतीचा हात देतो आहे लोकांना
तेच लोक हरण्या जिंकण्याची भाषा करतात
चार चोघात मलाच परके करून
स्वतःच माझ्या पाठीत खंजर खुपसतात..
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.३६)

आपल्यासाठी परके कोणीच नसते
आपणच आपल्यासाठी परके बनतो
चार चौघांच्या प्रतिष्ठे पायी
आपणच आपलेपण गमावतो.
लक्ष्मीकांत

आता सगळं संपलय,
उठलाय खेळाचा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
आता माळ आसवांची
पाहतेय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार
नाही कुणाच्या - साथीची
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.५०

वाट पहाणे हेच तर जीवन आहे
साथ घेण्यापेक्षा देण्याला महत्व आहे
झाल असत जर सगळ वेळे आधी
म्हटल असत मग आता जगण्यात काय मजा आहे .
लक्ष्मीकांत

आता खर असं वाटतेय कि
मी जिंकुनही हरले तू हरुनही जिंकला
मला खुप गर्व होता माझ्या शब्दांवर
आता तेच शब्द फ़क्त हसुन पाहत आहेत माझ्यावर
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.००

खूप खेळ खेळलो चारोळ्यांचा
वाटे कधी ना थांबो हा खेळ चारोळ्यांचा
पण तू अशी साथ ना कधी देणार
ना मला हौस जिंकण्याची
मला तर हौस दुसर्यांना सुखी पाहण्याची
म्हणूनच तुला जिंकवण्या करीता
केलेल्या चारोळ्या पुन्हा खोडतो मी....
तुझ्याच चारोळ्या जास्त तुलाच दर्शवतो मी....
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.५६)

शब्द आहेत ते
कधी न रुसणार कुणावर
मायेने गोंजारा त्यांना
नेतील ते एका सुंदर वळणावर
लक्ष्मीकांत

शब्दही उरले नाहीत आज सांत्वनाला !
अर्थ कधीच नव्हता त्या माझ्या शब्दांना !
एकदाच ये एकदाच माझ्यासाठी ,
यायचे न मी तुला पुन्हा कधी विनवायला !!!!!! !
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.१२

इतक्यात तू कशी हरली
बाजार तो कसला
मानतेस हा तर खेळ शब्दांचा
दुख: सोबत एकटेपणा आले तुझ्या वाट्याला
आम्ही असता तुझ्या सोबतीला
हसतात हसतच आले असतील ती आसवे
उगाच त्यांना दुखाचे नाव नको देऊ
आस ती डोळ्यात असवी नव्याची
पण साथ तुझी मी अजून सोडली नाही
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ६.१४)

हे ते पहा सूर्य उगवतो आहे
कदाचित त्याला हि घाई झाली असावी
शब्दांचा खेळ हा पाहणायची
आम्ही थकलो नसून
जागेच आहोत तुझ्यासाठी
हे सांगायचे आहे मला हि
०९/१०/११. (पहाटे ६.२६)

अखेर तू मला सोडून गेलास ,
भन्नाट वादळी वा-याप्रमाणे.
मी तुझ्या प्रेमात वेडी झाले ,
पण ते प्रेम तु पायदळी तुडवून गेलास ,
दिलास नकार मजला आणी,
परका करून गेलास .
जिंकून सवॅकाही
इथेच मला कायमचा हरवून गेलास
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.३०

हि घाई तर तुलाच
मला सोडून जाण्याची
वादळा समोर नतमस्तक होण्याची
आले प्रसंगात साथ न देताच
मला खोटे ठरवण्याची
जिंकणार तरी तू कशी
तुही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी....
०९/१०/११. (पहाटे ६.३६)


तू जिंकण्यासाठी स्वतःला हरवत गेले मी ..
स्वतःचे अश्रू विसरून तुला हसवत गेले मी ...
वाटलं होता थांबवशील मजला ..
नकळत स्वतःला एकट टाकून गेले मी ..
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ०६.४३


मी ना आस धरली जिंकण्याची
पण एक बरे तू हसण्यास लागली
आता हरून देखील जिंकलीस
मग तू एकटी कशी म्ह्नायायची.......
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ६.४६)

छायाचित्र चारोळ्या: मावळता सुर्य.. अन समुद्र किनारा

क्षितिजा पलीकडे तिथे,
कुणीतरी निघून जात होत...
हातातला हात सोडून,
एकटक नजर सोबत घेऊन......
वाईट....नाही नाही!
... वाटतंय ते रिकामपण.....
पोकळी भरून निघण महत्वाच.......
तिथे आठवण पण त्याचीच...
आणि आठवणीत पण तोच......
त्याची जागा कुणी भरून काढेल का???????
कदाचित अशेच विचार येत असावेत सागराच्या मनात....
सूर्यासाठी...सायंकाळी.....
रेशु ०९/१०/२०११ रात्री २.००

तुला मी कसे सोडून जाऊ
क्षितीज ना माझे इतके मोठे
कि तुला सोडून जारे
पण तू नजरे बरोबर शब्दाने हि वार करशी
जसे काळजात कट्यार खुपसशी.....
रणजीत...रात्री २.५६)०९/१०/११

हे ते पहा सूर्य उगवतो आहे
कदाचित त्याला हि घाई झाली असावी
शब्दांचा खेळ हा पाहणायची
आम्ही थकलो नसून
जागेच आहोत तुझ्यासाठी
हे सांगायचे आहे मला हि
०९/१०/११. (पहाटे ६.२६)

Wednesday, October 5, 2011

छायाचित्र चारोळ्या - तेवणारा दिवा...


दिव्यात पेटणारी वाट...
दिव्याच्या प्रेमात तेवते...
दिवा पण तिच्या साठी...
अंधारात राहून झुलतो...
©*मंथन*™..
 
तुझ्या प्रेमा खातर
तर हे सारे घडते
तुझ्यासाठीच मन
माझे असे एकटेच तेवते
रणजीत
 
पाहून  दिव्यातली तेजोमय वात, 
कविता फुलली मनात,  
होऊ दे प्रकाशमय आसमंत सारा, 
येणार्य दीपावलीच्या शुभेचा देउया जरा" 
*गीतांजली*  
 
अंधाराच्या रातीला...
चल भेदून टाकू....
ज्योती सोबत दिवा...
आण्याबान्या लागला टाकू...
©*मंथन*™
 
मी दिवा ...तू ज्योती...
तू प्रकाश तर मी वाती
उजळू दे आसमंतात
आपली प्रेमाची नाती....
कृष्णा
 
फक्त तुझ्यासाठी तेवत होती ..
डोळ्यात निरांजने आणि ज्योती..
तूच गेला सोडून मग ..
कोणासाठी लावू त्यात वाती..
मंजुषा ..
 
अंधार फार झाला
दिवा जपून ठेवा
असतील हृदयी, पनत्या जरी खुप
दिवाळी येतेय, आपणास शेभेछा खुप खुप..
*दाशु**
 
अंधारया राती उजेड
असू दया हाती
या देशात जगण्या- मारण्याची
केली आहे आम्हीच आमची गोती.....
रणजीत
 
अंधकारमय जगात माझ्या
तू प्रेमाचा दिवा बनून आलीस
प्रकाशून गेलाय असमत सारा
उजळवून निघाल्यात चारी दिशा
कृष्णा **
 
अंधकारमय जीवन तूच उजळ्शील
असतील नसतील ती तेज
माझ्या झोळीत घालशील
आई भवानी आशीर्वाद दे
तुझ्या लेकराला यशस्वी तूच करशील
रणजीत
 
हा अंधार तो काय अंधार
तू जवळ नसल्यामुळे आजन्म अंधार
उजळवून जातील चारी दिशा
जेंव्हा तू माझ्या आयष्यात येशील
रणजीत..
 
गेल्या स्मृतीच्या अंधारात
दिप प्रज्वलित केलाय मी
कुठूनशी तुझी झुळूक
आयुष्यात जपून ठेवलीय मी
रेशु
 
एक तूच होतीस...
मला प्रकाश देणारी....
नाहीतर या दुनियेत ...
अंधारच होता माझ्या...
*संजय**..
 
अंधारया राती, 
जळतात आठवणीच्या या वाती. 
उजळली सारी दुनिया, 
पण विरहाचा अंधारच राहिला कायम माझ्या माथी...
*कृष्णा*

वात बनून तुझ्यासाठी सतत तेवत राहणारी.....
तुला प्रकाश मिळावा म्हणून सदैव जळत राहणारी....
त्याच प्रकाशातून मार्ग काढून निघून गेलास....
सांग ना माझी काय चूक होती..
कि वात विझण्याआधीच तू मला सोडून गेलास....
सुप्रिया.
 
 दिव्यातली वात.....
आहे तुझीच साथ.....
तेवत राहा अशीच माझ्या अंगणात....
अंधाऱ्या रात्री करू नकोस हा कधी घात.....
सुप्रिया.
 
तू जळत असतेस..
तेव्हा मी पण वितळत असतो...
अजाणते पणी आपण...
मेणबत्तीचे गुणधर्म पाळत असतो...
@*मंथन*
 
तू दु:खा मध्ये जळत होतास....
मी विरहामध्ये तळमळत होते...
मी तर होऊन मेणबत्ती...
स्वत: चेच अस्तित्व संपवत होते....
सुप्रिया.
 
 

Monday, October 3, 2011

रणजीत च्या चारोळ्या भाग २

फसवत नाहीत नाती
फसत असतो आपण
सवयच ती कोणालाही जवळ करण्याची
मग दूर गेल्यावर दुख:त जाण्याची...
रणजीत.......०३/०२/११३.३६am

मनातला घाव मनातच
ठेवू जपून किती
अर्थच नाही प्रेमाला जिथं
ते प्रेम कुठवर तसेच नेवू.......
रणजीत.....०३/०२/११.3am

दुन्येच्या गर्दीत एकटा मी
दुख:त सावरतो स्वत:ला स्वत: मी
फुलायचे भान न्हवतेच मुळी मला
म्हणूनच काट्यांच्या मर्जीत एकटा मी
रणजीत ०३/०२/११ २.४६am

शुभ प्रभात............
पाखरे उठली
नव्या दिशेने चालण्यास
नवे लक्ष्य गाठण्यास
हसत मुख बागडण्यास.........
आपण हि अशीच सुरवात करू........
चला उठारे सकाळ झाली..........
रणजीत..........०४.०४am

जगावे किती कोणासाठी
पळावे किती मृगजळापाठी
हे चक्र चालावे तरी किती
जगण्यासाठी प्रश्न आहेत तरी किती
पण उत्तर फक्त एकच माझ्या शरीराचा अंतच..........
रणजीत....... १६/०९/११

जगतो तर असा रोजच
हसतो हि असा रोजच
लढेन हि शेवटपर्यंत
दोष मी कोणाला का देवू
मग कोणी भेटो वा न भेटो
जगणे मी का सोडू....
रणजीत....०३/०२/११/३.२४am

दुखाचा डोंगरच इतका
कि सुख काय दिसत नाही
तरही हसतो अन हसवतो आहे
जगण्या-मरण्याची तमा आज हि नाही......
रणजीत...०३/०२/११ ३.२६.am

अस फक्त तुलाच का वाटत
माझा काय फायदा
म्हणून तुझे (तिचे) सुख मागतो
तू (ती) नाही म्हणून कि काय
चालताना कधी कधी रस्त्यावर एकटाच थांबतो...
रणजीत.......०३/०२/११/३.१६.am

Wednesday, September 28, 2011

भगतसिंग जाणून घ्या

भगतसिंग जाणून घ्या थोडा नास्तिक नसून आस्तिकच होता पण त्यांना नास्तिक बनायला लागल समाज घडवण्यासाठी, बदलण्यासाठी त्यांनी त्यावेळच्या व आजच्या पिढीला नवा आदर्श दिला आहे देशभक्तीची मशाल दिली आहे अश्या महापुरषास मनाचा मुजरा....... (रणजीत)

२३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग(सप्टेंबर २७, १९०७ - मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांनी ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो.
भगतसिंग विचार
प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये, समजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग - नरक, जन्म -पुनर्जन्म,८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांड्वलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते
संग्रहित........
माझे बोल
मला हि भगतसिंग सारखे व्हायला आवडेल त्यांच्या विचारावंवर जगायला आवडेल आजही क्रांतीची गरज आहे. ती करण्या करिता प्रत्येकामध्ये भगतसिंग सारखे विचार पेर्याला हवे मी माझ्या परीने प्रयत्न करच आहे पण तुम्ही हि क्रांतीचे साक्षीदार व्हा! असे मला वाटते कारण क्रांती हि एकट्याने होत नसते असे हि आहे व षंड म्हणून जगण्याला काही अर्थ आहे का?
या मानलेल्या देवानी फक्त मानवाला बुद्धी दिली आहे व तशी कार्यक्षमता म्हणून अन्यथा इथल्या जनावरांनी कंटाळून पुन्हा क्रांती घडून दिली असती.......
कारण भारतातील लोकानकडून काय होणे दिसत नाही जो तो नुसता स्वार्थीपणा नाकोत्या गोष्टीकडे नाहकभर.....
आजही युवा पिढी नको तेथे जाया होताना दिसते देशभक्ती तर सोडा पण आई बाबांचा हि आदर नाही ठेवत ते अश्या क्रांतीकारांचा काय ठेवणार........
असो पण आता अति होत आहे असे नाही का वाटत आता पुन्हा गरज आहे कि नाही क्रांतीची असे नाही का वाटत
सर्वस्वी विचार तुमचा...........
रणजीत......
प्रजासत्ताक.....२८.०९.११
या लेखाचे सर्व अधिकार लेखक आणि "माझी लेखणी" यांचे आहेत...